पुणे-सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण कराल तर खबरदार … गाठ माझ्याशी आहे … छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्न युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित केला.आणि लक्षात ठेवा ..गाठ माझ्याशी .. मी चालवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा हरहर महादेव आणि दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या लेखक,वेशभूषाकार ,निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला .
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना जाहीर इशाराही दिला.
चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजीराजे यांनी विचारलं.
“इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करुन असले चित्रपट काढत आहात,” असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील मावळ्यांच्या पोषाखावरही भाष्य केलं. चित्रपटाचं पोस्टर दाखवत ‘हे मावळे वाटतात का?’ अशी विचारणा त्यांनी केली.
“मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. चित्रपट काढून तर दाखवा, मी आडवा नाही आलो तर बघा. मीच आडवा येणार, अन्यथा या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळप्रसंगी मला काही झालं तरी चालेल, पण महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा,” असा जाहीर इशारा यावेळी त्यांनी दिला. जरा भालजी पेंढारकर यांचा आदर्श घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.