पुणे – -जातीभेदाची दरी संपुष्टात आणून आपण सामाजिक प्रगती केली पाहिजे . यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी एका मेळाव्यात केले .
वडार समाज संघ , महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी मालधक्का चौकातील डॉक्टर आंबेडकर भवनात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु -वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याचे उदघाटन डॉक्टर धेंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे , वडार समाज संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, माजी नगरसेविका शारदा ओरसे , संघाचे कार्याध्यक्ष भाऊलाल पवार ,जेष्ठ उपाध्यक्ष जगन्नाथ फुलारे , महादेव कुसाळकर , सिताराम शिंदे , सरचिटणीस दिलीप गुंजाळ , अशोक कुलाल , माजी अध्यक्ष डॉक्टर श्रावण रॅपनवाड, लक्ष्मण बामणे , रमेश जेठे, आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात राज्यभरातून ६०० हुन अधिक उपस्थित होते,
डॉक्टर धेंडे म्हणाले कि, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे . पुणे स्मार्ट सिटी होत चालले आहे. पुण्यात पंचतारांकित विद्यापीठे झाली आहेत. एकीकडे हि प्रगती होत असताना या प्रगती मध्ये वडार समाजाचे स्थान कुठे आहे. याबद्दल अभ्यास होण्याची गरज आहे. . हा समाज चांगलाच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय याची सर्वानी दखल घेण्याची गरज आहे .आज भारतात जातीभेद दूर होण्याबद्दल सर्वचजण बोलतात . यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.
सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले कि , वडार समाजाने देशांच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला आहे .
प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर म्हणाले की , जाती -पोटजातीच्या जोखडातून सर्वानी बाहेर पडण्याची गरज आहे. तरच आपली सामाजिक प्रगती होईल .