धर्म आणि जाती-पातीच्या व्यवस्थेवर देशाची विभागणी नको-मीरा कुमार

Date:

पुणे : भारतात जाती प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. ज्या व्यवस्थेमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा व्यवस्थेला आपण का स्थान दिले आहे. धर्म आणि जाती-पातीच्या या व्यवस्थेमुळे लोकांचा आत्मसन्मान पांगळा होत आहे. तरीही ही व्यवस्था का नष्ट होत नाही, हा प्रश्न कायम आहे. जाती व्यवस्थेमुळे आज समाज विखुरलेला आहे. त्यामुळे आपली ताकद दिसत नाही. जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असलेला अद्भूत असा भारत देश असूनही आपण अशा देशाची धर्मा आणि जाती-पातींमध्ये विभागणी का करीत आहोत, असा सवाल लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केला.
‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ. विकास आबनावे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, अविजित अंशुल, डॉ. नफेसिंह खोबा, त्रिमोहन कुमार, मनोज कुमार, दिलीप आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रकाश आबनावे प्रसाद आबनावे आदी उपस्थित होते.
मीरा कुमार म्हणाल्या, बाबू जगजीवनराम यांनी ८२ वर्षापूर्वी सन १९३५ साली दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा लढा पुण्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविला होता. यावेळी जातीपातीविरोधात झालेल्या या क्रांतीनंतर अनेक मंदिराचे दरवाजे समाजातील प्रत्येकासाठी खुले झाले. परंतु आजही अनेक मंदिराचे दरवाजे बंद आहेत. अजूनही क्रांती संपली नाही. त्यामुळे पुणेकरांनी ही क्रांतीची ज्वाला तेवत ठेवावी.
त्या पुढे म्हणाल्या, महिला, दलित, गरीब लोकांसाठी सरकार अनेक योजना राबविते. योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही. या समाजघटकांनी त्यांचे बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिले आहे. त्यामुळे जे मागे राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ अणि नवीन भारत घडवू. स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम या पुस्तकातून नवीन पिढीला योग्य मार्ग मिळेल, त्यासाठी प्रकाशस्तंभाचे काम हे पुस्तक करेल, असेही त्यांनी सांगितले.
उल्हासदादा पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ, इंदिरा गांधी, मीराकुमार यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचा बौद्धीक वारसा भारताला मिळाला आहे. सुमारे १२५ कोटी लोकसंखेच्या देशात १६ वर्षे इंदिरा गांधी यांनी राज्य केले आणि पंतप्रधान कसा असावा याचा आदर्श घालून दिला. मोहन जोशी म्हणाले, १९७१ च्या युद्धात बाबू जगजीवनराम यांचे मोठे योगदान होते. सैनिकांना भेटून त्यांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला. आजच्या बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, बाबू जगजीवनराम यांची स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे माजी उपपंतप्रधान म्हणून सर्वदूर ओळख आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यलढयातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांवरील कार्य आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने उचलेली पाऊले याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे त्याविषयी सविस्तर लेखन करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ.सुमीता सातारकर यांनी देवीस्तवन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नीता गुमास्ते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छाया आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती हिरे यांनी आभार मानले.
* कॉंग्रेस मुक्त भारताऐवजी गरीबी, जाती-पाती मुक्त भारताचा नारा हवा – मीरा कुमार
आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला जात नाही. आज मी मन की बात नाही, तर दिल की बात, आत्मा की बात करीत आहे. एकाच धर्माचे लोक भारतात राहणार असतील, तर बाकीच्या धर्माचे काय होणार, ते लोक कुठे जातील. वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही. तर चांगले विचार निर्माण करणे आणि माणसाच्या मनात देवत्व निर्माण करणे, हे धर्माचे काम आहे. माझे बाबा जगजीवनराम यांनी मला शिकविले होते की जेव्हा आपण ख-या अर्थाने दुसºया धर्माचा आदर करु,  तेव्हाच आपण आपल्या धर्माचा आदर करायला शिकू आणि हाच खरा भारतीय विचार आहे.
* पुणे ही क्रांतीची भूमी – मीरा कुमार यांच्याकडून पुण्याचे कौतुक
तब्बल २२ वर्षांनंतर मी पुण्यात आले आहे. इथले वातावरण अतिशय सुंदर आहे. आधुनिक भारताचे हे आधुनिक शहर आहे. उद्यम, परिश्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे शहर असून ही क्रांतीची भूमी देखील आहे. क्रांतीचे बीज येथे रोवण्यात आले होते. इथे खूप प्रेम मला मिळाले, परंतु मी पुण्यात यायला उशीर केला, असे सांगत त्यांनी पुण्याचे कौतुक केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...