विमानतळे पूर्ण सुरक्षित : टी सी . सजीत
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आयोजित ‘ चेकमेट २०१९ ‘ : आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हॉटेल अरोरा टॉवर्स येथे बंगळुरू विमानतळाचे मनुष्य बळ विकास विभागाचे मुख्यधिकारी टी सी . सजीत यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार अध्यक्षस्थानी होते . अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘चे संचालक आर . गणेसन यांनी स्वागत केले . सामाजिक योगदानाबद्दल एस . मुरलीधरन यांना ‘जीवनगौरव ‘पुरस्कार देण्यात आला .परिषदेचे हे ११ वे वर्ष होते .
परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
टी सी . सजीत म्हणाले ,’भारतीय विमानतळाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून ,पूर्ण जबाबदारीने राखली जात आहे .विमानतळे पूर्ण सुरक्षित आहेत . प्रत्येक प्रवेशावर नजर ठेवली जाते . सुरक्षिततेचे नियम कडक करण्यात आले आहेत . त्यासाठी मानवी सुरक्षेबरोबर अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला जात आहे . सध्या ६ विमानतळांची जबाबदारी खासगीकरणातून देण्यात आली आहे . भावी काळात १४० विमानतळे खासगी होणार आहेत . दोन हजार विमाने देशात पुढील सात वर्षात उपलब्ध होत आहेत . अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रे पाहता व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होत असून व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करावी ‘
डॉ . पी . ए इनामदार म्हणाले ,’गेल्या पाच हजार वर्षात झाली नव्हती इतकी प्रगती स्वातंत्र्योत्तर काळात झाली आहे . त्याबाबत न्यूनगंड बाळगण्यासारखी वस्तुस्थिती नाही . व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जगात नवी आव्हाने पेलली पाहिजेत . ‘
उद्योग जगतातील अनेक मान्यवर ,संशोधक ,व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले होते .