पुणे-गेल्या काही दिवसात झालेल्या नगर रोड वरील बीआरटी मार्गावरील अपघातांची जबाबदारी हि घाईने उद्घाटन करून केलेल्या राष्ट्रवादीची आहे असा सूर लावत राष्ट्रवादीला टार्गेट करू पाहणाऱ्या भाजप आणि प्रशासनाचा डाव आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत माजी सभागृह नेते आणि नगरसेवक सुभाष जगताप यांनी हाणून पाडला . राष्ट्रवादीचीच जबाबदारी कशी असेल ?सत्ताधारी कोणीही असून द्यात ? बीआरटी चे काम पूर्ण झालेले नाही असे पीएमपीएल ने निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याचे उद्घाटन मी करणार नाही त्यास परवानगी देणार नाही अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घ्यायला हवी होती. मग त्यांनी ती का घेतली नाही तसे त्यांनी उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना का बजावले नाही ?याचा जाब आता आयुक्तांनाच विचारायला हवा असा आक्रमक पवित्रा सुभाष जगताप यांनी घेतला आणि अन्य राजकीय पक्षांची राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची खेळी उलथवून लावीत नगरसेवकांना किंवा कोणत्या पक्षाला बदनाम करू नका असे आवाहन करीत महापालिकेच्या सभागृहातील राजकीय चर्चेचा सूर एकदम बदलवून टाकला आणि त्यांच्या आवहानापुढे आक्रमक झालेल्या अन्य राजकीय नगरसेवकांनीआपला टीकेचा सूर थांबविला .
मात्र पुण्यातील बीआरटी अहमदाबाद हून देखील उत्तमच असा आपला खुलासा करून तत्पूर्वीच आयुक्त कुणालकुमार सभेतून निघून गेले होते .
पीएमपीएल चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी बीआरटी इन्फ्रास्ट्रक्चर ची जबाबदारी महापालिकेची असून पीएमपी फक्त त्यावरून बस सेवा देण्याचे काम करते . बीआरटी मार्गात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले पण त्या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे यावेळी स्पष्ट केले .
आज महापालिकेच्या सभेत पुन्हा एकदा बीआरटी चा मुद्दा गाजला . बीआरटी नकोच अशी भूमिका धनंजय जाधव यांनी घेतली . तर अशोक हरणावळ , गणेश बिडकर आणि बाबू वागस्कर यांनी सुरुवाती पासूनच बीआरटी मार्गाचे काम अपूर्ण असताना अजित पवारांना दाखविण्यासाठी घाईने राष्ट्रवादी पक्षाने येथे उद्घाटन केले आणि त्यामुळे आज सातत्याने अपघात होवून नागरिकांना हानी पोहोचत असल्याचा आरोप यावेळी केला होता . तर अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांनी बीआरटी मार्गावर होणाऱ्यां अपघातांची जबाबदारी निश्चित करा केवळ अपघातग्रस्तांना आर्थिक भरपाई देवून यातून महापालिका आपली सुटका करवून घेत असल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता .या पार्श्वभूमीवर सभागृह नेते बंडू केमसे आणि महापौर प्रशांत जगताप यांनी बीआरटीमार्गातील त्रुटी दूर करू . अपघात हे बीआरटीचा रस्ता ओलांडू पाहणाऱ्या नागरिकांमुळे होतात अशी सावरासावर करीत राष्ट्रवादीची बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरु ठेवला पण विरोधकांच्या पुढे हा प्रयत्न केविलवाणा ठरत होता यावेळी अविनाश बागवे यांनी कृष्णा यांना … आयुक्तांना उद्घाटनापुर्वी काय पत्रे दिली होती ती दाखवा असा महत्वपूर्ण मुद्द्दा उपस्थित केल्यानं कृष्णा यांनी २ पत्रे सभागृहात उपस्थित केली आणि बीआरटी मार्गावरील त्रुटी त्यातून आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे स्पष्ट केले . अखेरीस यावेळी बीआरटी चे पथविभाग प्रमुख बारापात्रे आज गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले . .. बीआरटी मार्ग पूर्ण झालेला नसताना त्यास सुरु करण्याची अनुमती देण्याची आयुक्ताची जर जबाबदारी होती … तर नामदेव बारापत्रेन्चा बळी का देता ? असा सवाल यावेळी पृथ्वीराज सुतार यांनी केला .
बीआरटी मार्गावरील त्रुटी महिनाभरात दूर करण्यात येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .पाहू यात या व्यतरिक्त सुभाष जगताप यांनी कसा संताप व्यक्त केला