पणजी – मला माहिती आहे,मी कोणा कोणाबलाढ्यांशी पंगा घेतला आहे , ‘ते’मला जिवंत सोडणार नाहीत ,मला बरबाद करतील …७० वर्षांचे त्यांचे मी नुकसान करीत आहे , पण इमानदारीच्या कामासाठी आपण मला फक्त ५० दिवस साथ द्या, ५० दिवस फक्त मला मदत करा , … ७० वर्षांचा हिशेब मला १७ महिन्यात घ्यायचा आहे . असे कधी भावनिक तर कधी तडाखेबाज प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले
गोव्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन संपन्न झाले .यावेळी ते बोलत होते .राहुल गांधींचे नाव न घेता ते म्हणाले , बडे बडे घोटाळे तुम्ही ऐकलेत ज्यांच्या काळात , ४ हजारासाठी रांगेत उभे राहावे लागले कि नाही त्यांना , ५०० हजाराच्या नोटा बंदीने आम जनतेला त्रास होत आहे याची मला कल्पना आहे . पण आणखी ५० दिवस फक्त मला साथ द्या . देशातील इमानदारांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. काही लोकांना वाटते , खूप येतात, खूप जातात तसा हा हि जाईल , पण मला खुर्चीचा मोह नाही, इमानदारी चे राज्य निर्माण करूनच दाखवेन . काहींना वाटते पाहू यात पुढे … पण त्यांनी मला निट ओळखावे मी स्वातंत्र्य मिळाल्यापासून चा हिशेब मी बाहेर काढणार आहे ,भ्रष्टाचार , बेईमानी याविरोधात अजून खूप योजना आहेत , ज्या पुढे येणार आहेत ,यापुढे मेहनत करणाऱ्या आणि प्रामाणिक माणसांचेच राज्य असेल . शून्य रुपयांची खाती उघडा असे मी सांगितले तेव्हा , २० करोड लोकांनी खाती उघडली आणि तब्बल ४५ हजार करोड रुपये जमा केले . सामान्य लोकांची हि ताकद निश्चितच वाखाणण्याजोगी आहे . पण आता ज्यांनी खाती उघडलीत त्यांना नक्कीच फायदा होईल . २ वर्षाच्या माझ्या कामाचा हिशेब मी गोव्याच्या भूमीवरून सदर करतो असे हि ते यावेळी म्हणाले
खरे तर त्यांचे भाषण वाचण्या ऐवजी ऐकण्यासारखे आणि पाहण्यासारखेच आहे .. ते आपण नक्की पहा …