स्वत:चे आयुष्य घडवा,बिघडवू नका -निलेश जगताप

Date:

वडवणी-आजच्या अधुनिक युगात तरूणाई वाम मार्गाला लागुन आपले आयुष्य बरबाद करू लागली आहे.अरे जरा थांबवारे हा उपद्रव स्वत:चे आयुष्य स्वत:नेच घडवयाचे असते अशी शिकवण त्याकाळी राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँ.साहेब यांनी दिली.ते आचरणात आणा आणि स्वत:चे आयुष्य घडवा असे आवाहन आपल्या सुमधुर व्याख्यानातुन प्रसिध्द व्याख्याते  शिवचरित्रकार निलेश जगताप यांनी जिजाऊ जन्मउत्सवा निमित्त आयोजित व्याख्यानमालेत व्यक्त केले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे हस्ते माँ जिजाऊ साहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
  वडवणी तालुका शिवसेनेच्या व समाज बाधवांच्या वतीने मोठया उत्सवात माॅ साहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
बीड- परळी हायवे रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात भगवा ध्यज फडकावुन अभिवादन करण्यात आले. यानंतर शहरातील जाधव कॉम्प्लेक्स मध्ये व्याख्याते निलेशजी जगताप यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी पञकार हल्ला कृती समीतीचे राज्य अध्यक्ष एस.एम.देशमुख यांची विषेश उपस्थिती लाभली.
पुढे बोलतांना व्याख्याते जगताप म्हणाले की,
राजमाता, स्वराज्यमाता, राष्ट्रमाता,लोकमाता जिजाऊ मा साहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ मा साहेबांचे नाव घेताच त्यांचे कार्य आठवते; आणि त्यांच्या चरणी मन हजारदा लोटांगण घेत राहते. इतिहास आम्हाला त्यांच्या नितीसाम्पन,महत्वाकांक्षी, परिवर्तनवादी,कर्तव्यदक्ष,त्यागी ,न्यायनिष्ठुर ,
 समतावादी ,दूरदृष्टी ,करारी ,धाडसी ,पराक्रमी इत्यादी दुर्मिळ गुणांची साक्ष देत आहे; त्यांच्या श्रेष्ठ कर्तुत्वाची ग्वाही देत आहे. या सर्व गुणांना आठवत असतांना त्यांच्या महत्वाकांक्षी,
परिवर्तनवादी, आदर्षमाता, आदर्श गुरु या गुणांचा प्रामुख्याने व मुद्दाम उल्लेख करत आहे. या मागचे कारण आजच्या सर्वच माता-पित्यांना,भाव-भगिनींना त्यातून स्फूर्ती घेवून ती स्फूर्ती आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कारणी लावावी हीच एकमेव अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्य व्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतीकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही,की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुण संपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच शिवमाता-राजमाता-राष्ट्रमाता-जिजामाता होत्या.आपण मात्र महापुरुषांचे विचार स्मरणात आणत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.आपल्या साठी काय केले नाही असे एखादे उदाहरण दाखवा मग आपण मागे का आहोत याचे कारणे शोधणे गरजेचे आहे. जिजाऊँ ची शिकवण आणी आदर्श छत्रपती शिवाजी राजांनी घेतला, शिवाजी महाराजांचा आदर्श महात्मा ज्योतीबा फुलेंनी घेतला, महात्मा फुलेंचा आदर्श छत्रपती शाहु महाराजांनी घेतला, शाहु महाराजांचा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला हे सर्व असे चालत आलेले असतांना आपण का ? भरकटलो जातोय राष्ट्रमाता राजमाता जिजाउ मॉ साहेबांची शिकवण आणि या महापुरुषांचा आदर्श आपण का घेऊ शकत नाहीत ही एक शोकांतीकाच नव्हे काय.आपली तरुणाई वाम मार्गाला लागली आहे. आता हे थांबले पाहीजे तलवारी ऐवजी आता लेखणी घ्या. कुणी कलेक्टर, कुणी एसपी, कुणी तहसिलदार बना आणी आपल्या जिवणाचे सार्थक साधा. या महापुरूषांच्या विचारांचे आदर्श घेत जिजाऊ मातेची शिकवण जोपासा निश्चीतच यश मिळेले असा संदेशही व्याख्याते निलेश जगताप यांनी हजारों शिवप्रेमी नागरीकांना दिला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे, नगरपंचायत गटनेते शेषेराव जगताप, राकाँ तालुकाध्यक्ष दिनेश मस्के, शहर अध्यक्ष संतोष डावकर, भाजपा युवा नेते संजय आंधळे, रिपाई तालुका अध्यक्ष महादेव उजगरे,डॉ महादेव जाधव, डॉ महादेव नाईकनवरे ,नगरसेवक कचरू जाधव, दादासाहेब मुंडे, शहरप्रमुख नागेश डिगे, किसान सेेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब चाटे, भाजपा तालुका अध्यक्ष रामेश्वर सावंत, रोहयो तालुका अध्यक्ष शिवाजी तौर, महीला आघाडी उपजिल्हाप्रमुख संगीता चव्हान, तालुकाप्रमुख प्रमीला माळी, नगरसेवक अस्लम कुरेशी,
तालुका उपप्रमुख रामदास ढगे, तालुका सचिव युवराज शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेब लोकरे, तालुका उपप्रमुख युवराज रेडे, दिपक उजगरे, सर्जेराव जोगदंड, रा.काँ चे भास्कर ऊजगरे,अंबादास जाधव, जिजा लंगे, किसन माने ,हनुमंत शिदे , संजय धपाटे, भैय्या खोसे,रवी कांबळे,दिपक झाडे,वाचिष्ट शेडगे , महादेव शेळके, संतोष बादाडे, नवनाथ मोरे, क्रष्णा काळे, राहुल काळे, रामभाऊ सवासे, दत्ता सावंत, आणा राऊत, आणासाहेब शिंदे,मधुकर नागरगोजे,आशेक लोकरे, रामदास बादाडे, अंगद काळे, राहुल वाडरे, नरदे राठोड,सचिन धपाटे, महेश रासवे , बालु बादाडे, विनायक झाटे आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....