पुणे : विद्युत यंत्रणेत काम करताना वीज दिसत नसल्याने जाणते, अजाणतेने झालेली चूक ही जिवावर बेतू शकते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील अपघाताचे धोके टाळण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्कता किंवा सावधगिरी बाळगणे यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी बुधवारी (दि. 11) व्यक्त केले.
राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित जिल्ह्यातील विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन आज शनिवारवाडा येथे झाले. या कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे बोलत होते. यावेळी विद्युत निरीक्षण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. एस. आर. नलावडे, विद्युत निरीक्षक श्री. एन. आय. पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, सुनील पावडे, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री. एस. आर. देवगेकर, श्री. एन.जी. सूर्यवंशी, श्री. एस. एल. डेकाटे, ‘कमिन्स’चे श्री. शैलेश हट्टी, लिफ्ट कॉन्ट्रॅक्टर असोशिएशन श्री. फुलारी यांची उपस्थिती होती.
विद्युत अपघातातील जीवहानीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते व कर्मचारी गमावल्याने कंपनीचे तसेच कुटुंबियाचे भरून न येणारे नुकसान होते. विद्युत यंत्रणेपासून सावधानता न बाळगल्याने नागरिकांनाही अनेक कारणांमुळे वीज अपघात होतात. त्यामुळे वीज कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी विद्युत यंत्रणेपासून सतर्क राहण्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर महावितरण, विद्युत निरीक्षक विभाग व औद्योगिक कंपन्या यांच्या संयुक्तपणे सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली. शनिवारवाडा, आप्पा बळवंत चौक, मंडई व बाजीराव रोड परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच माहिती पत्रक, माहिती पुस्तिकांचे नागिरकांना वितरण करण्यात आले. या रॅलीत महावितरणचे कार्यकारी अभियंता सर्वश्री गणेश एकडे, नरेंद्ग ताडे, ज्ञानदेव पडळकर, दीपक लहामगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्या व संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.