Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याबाबत खा.वंदना चव्हाण यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Date:

पुणे :
नुकत्याच प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील गुन्हे-2015 या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) देवेंद्र फडणवीस यांना खेद व्यक्त करणारे पत्र पाठविले आहे. ‘महाराष्ट्रातील गुन्हे-2015’ या अहवालानुसार स्त्रियांवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याच्या दृष्टिने ही बाब अधिक खेदजनक आहे, असे मत खा.वंदना चव्हाण यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
‘महाराष्ट्रातील गुन्हे-2015’ या अहवालाचे प्रकाशन गुन्हे अन्वेषण विभागाच्याकडून सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2016 रोजी झाले. त्यातील माहितीनुसार स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 16.57 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. स्त्री अत्याचाराचे 31 हजार 126 गुन्हे वर्षभरात दाखल झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्त्रियांमधील सजगता आणि जागरूकता वाढली त्यामुळे स्वत:वरील अत्याचाराची तक्रार ती करू लागली ही समाधानाची बाब असली तरी विविध कारणांमुळे स्त्री अत्याचाराचे गुन्हे न्यायालयात सिद्ध होत नाहीत आणि अनेक आरोपी निर्दोष सुटतात. याबाबत विधिमंडळाने कडक कायदे केले आणि पोलिस यंत्रणेने तपास व पुरावे जमा करण्याबाबत कार्यक्षमता व तत्परता दाखवली तर स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण निश्‍चितपणे वाढेल. एकूणच समाजातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
आज किमान स्त्रीला सुरक्षित आणि निर्भयपणे जगण्याची खात्री मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थीनी, शेतमजूर, शहरांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणार्‍या स्त्रिया यांना आज सुरक्षित वाटत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन स्त्रियांवरील गुन्ह्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवणे आणि अशा प्रकरणातील तपासात आणि पुरावे गोळा करण्यात पोलिस यंत्रणेकडून सजगता दाखवणे यासाठी आपण संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत. याबरोबरच महिला अत्याचारांच्या घटनांच्याबाबत सरकारने सातत्याने आढावा घेऊन त्याबाबतच्या उपाय योजनाची अंमलबजावणी करावी असे सुचवावेसे वाटते.
आपल्यासारखी संवेदनशील व्यक्ती राज्याच्या प्रमुखपदावर असल्याने पोलिस यंत्रणा व गुंडांना योग्य तो संदेश जाणे आवश्यक आहे. जेणेकरून राज्यात स्त्रियांना सुरक्षितपणे जगता येईल.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...