मुंबई-एकीकडे काल विश्वंभर चौधरी यांनी अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टी च्या आंदोलनाला भारतीयांचे आंदोलन म्हणत या आंदोलनामुले भाजपचेच नुकसान होणार आहे , या आंदोलनाशी कोणत्याही विरोधी पक्षांचा संबध नसल्याचे सांगून राहुल गांधी हाच चेहरा PM पदासाठी घोषित करावा असे म्हटलेले असताना आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अभिजीत दीपके आणि मोदी यांच्या भेटीचे फोटो मला एकाने पाठवले असाही दावा संजय राऊत यांनी केला, मोदींच्या भेटीनंतरच दीपके भारतात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आज पुण्यामध्ये त्यांच आंदोलन होत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी चर्चा सुरू असताना आता संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे, अमेरिकेमध्ये मोदी आणि दीपके यांच्या भेटीच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जी मीटिंग झाली त्याचे फोटो एकाने पाठवले आहेत. त्याच्यानंतर दिपके भारतात आले अशी माहिती काही लोकांनी सांगितली. मी हे आरोप करत नाही, माझी माहिती लोकांनी पोहोचवलेली आहे, ती मी सांगत आहे, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, मात्र जेव्हा काही माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते, तेव्हा माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवं यासाठी आम्ही भूमिका मांडली. या माध्यमातून सरकारला मदत करत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे, असंही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांचं खरं पंतप्रधान पद हे २०१४ ते २०१९ लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यानंतर चोरलेल्या निवडणुकीतून ते पंतप्रधान झालेले आहेत. २०१४ मध्ये लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत जनतेने पराभूत केलेले असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडीचा वापर या माध्यमातून ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत २०२४ मध्ये ते निवडून आलेलेच नाही. ते कुठे इलेक्टेड प्रायमिनिस्टर आहेत? असा टोला राऊतांनी लगावला. निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनात घोटाळा करून जिंकल्या आहेत, पक्ष फोडा तुरुंगात टाका हे काम मोदी यांनी केले, २०१४ ते २०१९ हे मोदींचे खरं सरकार आहे, नंतर चोरलेलेले लोक आहेत, त्यानंतर दोन्ही निवडणुका जनतेने पराभूत केले असताना ते ते संस्थांचा वापर करून चोऱ्या करून जिंकले आहेत

