पुणे-वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याच्यावतीने जगत गुरु महर्षी वाल्मिकी स्वामी जयंतीनिमित्त वाल्मिकी समाज बांधवांचा भव्य मेळावा संपन्न झाला . टिम्बर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाची सुरुवात जगत गुरु महर्षी वाल्मिकी स्वामी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या मेळाव्यास वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मन्नू कागडा , पुणे शहराध्यक्ष पप्पू उज्जेनवाल , नगरसेविका मनिषा लडकत , तुषार पाटील , नरोत्तम चव्हाण , भिकाचंद मेमजादे , मोतीलाल निनारिया , मिलिंद अहिरे , कविराज संघेलिया , मेघराज पवार , गणपत दगडे , विनोद निनारिया आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्यामध्ये वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मन्नू कागडा यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , महर्षी वाल्मिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी वाल्मिकी समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली . तसेच जातीचा दाखला काढताना पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा देण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली . भगवान वीर गोगादेव उत्सवामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली .
यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजगौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . या मेळाव्याचे संयोजन अशोक चौधरी , नरेश वाल्मिकी , विशाल पिवाल , रामेर कागडा , बलवान डूमडा , भरत भुबक , शक्ती चावेरिया , ब्रिजपाल वाल्मिकी , महेश पारचा यांनी केले होते .