अजित पवार यांच्याकडे केली पत्राद्वारे मागणी
पुणे-द आनंद मॅरेज (अमेनटमेन्ट)कायदा २०१२ केंद्रसरकारने समंत करण्यात आलेला आहे . तो महाराष्ट्र सरकारने त्वरित लागू करण्याची मागणी पुण्यातील शीख बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना पत्राद्वारे केली भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील असताना त्यांनी ८ जून २०१२ रोजी हा कायदा संमत केला . कायदा समंत केलेले गॅझेट सर्व राज्यांना लागू करावे असे नमूद करण्यात आले होते . आता हा कायदा फक्त पंजाब , हरियाणा व दिल्ली येथेच लागू आहे . तरी महाराष्ट्रात द आनंद मॅरेज (अमेनटमेन्ट)कायदा लागू करावा . अशी मागणी पुण्यातील शीख बांधवानी अजितदादा पवार यांच्याकडे केली .
यावेळी हारपालसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , , बलबीरसिंग व्होरा , सुरजितसिंग राजपाल , गुरुविंदरसिंग राजपाल , गुरुप्रीतसिंग राजपाल , गुरुप्रीतसिंग शर्मा व बॉबी सहानी आदी मान्यवर उपस्थित होते .