Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काळा पैसा ही एक वाईट मानसिकता -एन. गोपालस्वामी

Date:

पुणे दि. 19 : “ काळापैसा ही एक वाइट मानसिकता बनली आहे, जी तुम्ही अणि मी जन्माला घातली आहे. अंमलबजावणी ही फक्त एकच गोष्ट आहे जी त्याला रोखु शकते. आज निवडणुका म्हटले की काळा पैसा असे समीकरण झाले आहे. मात्र आज काळा पैसा संपवण्यासाठी स्वत:ची मानसिकता बदलने गरजेचे आहे.“ असे मत माजी मुख्य निवडणुक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात  काळा पैसा आणि निवडणुका : मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? या विषयावर ते बोलत होते.
  याप्रसंगी जम्मू काश्मिर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. आर.डी. शर्मा, तिबेटचे पंतप्रधान लोबसंग संगे, गांधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार गांधी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, भारताचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, नागालँड विधानसभेचे सभापती श्री. छोटीसुह साझो, ओरिसाचे आमदार श्री. अनुभव पटनाईक, काँग्रेसचे प्रचार सल्लागार श्री. शशांक शेखर शुक्ला, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ओरिसाचे आमदार अनुभव पटनाईक व जम्मू-काश्मीरचे आमदार विकार रसूल वाणी यांना आदर्श युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले.
एन. गोपालस्वामी म्हणाले, “काळापैसा हा फक्त निवडणुकांशी संबंधीत नाही परंतू हे ही तितकेच सत्य आहे की काळ्या पैसा हा मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्येच वापरला जातो. जर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी संबंधीत प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आम्ही दोन दशकांचा अवधी घेत असू तर काळ्या पैशांच्या अंमलबजावणी बाबत बोलायलाच नको. आपल्याकडे एक काळ असाही होता जेंव्हा मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री देखील बसने प्रवास करायचे. ज्यांनी चांगुलपणाचा एक पायंडा घातला होता. पण आज हे चित्र पुरते बदलले असून राजकारणाइतका दुसरा उत्तम धंदा शोधुनही सापडणार नाही.
एस. वाय. कुरेशी म्हणाले, सगळेच राजकीय पक्ष हे भ्रष्टाचारी नाहीत परंतू बरेच जण त्यात बरबटलेले आहेत. राजकारण म्हणजे मनी एन्ड मसल पॉवर हे समीकरण बनले
आहे. लोकसभा व विधानसभेच्या समांतर निवडणुका या भारतासाठी अतिशय योग्य समीकरण बनु शकते. परंतू त्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती आणि घटना दुरुस्ती गरजेची आहे.
नरेंद्र जाधव म्हणाले, राजकीय पक्ष, उद्योजक, स्वयं कामगार व प्रशासन हे काळ्या पैसा निर्माण होण्याचे प्रमुख स्त्रोत बनले आहेत. भारतामध्ये दीड हजरपेक्षा जास्त राजकीय पक्ष असून त्यापैकी फक्त पन्नासच्या आसपासच राजकीय पक्ष निवडणुका लढवतात आणि बाकीचे इतर पक्ष फक्त काळापैसा वहनाचे काम करीत आहेत.
   प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा पुणे, दि.१६ : पालखी...

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन बारामती,...

बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा 'नरकातला...