जनता हीच आमची शक्ती आहे- अर्णव गोस्वामी ; भारतीय छात्र संसंदेच्या पहिला सत्रात व्यक्त केले मत

Date:

पुणे  : “ रिपब्लिक वाहिनी सुरू करताना आम्ही जनतेच्या, विशेष करून  युवकांच्या शक्तीवर विश्‍वास ठेवला आहे. आजपर्यंत आम्ही परकीय वाहिन्या आणि सत्ताधार्‍यांच्या प्रभावाखाली असलेल्या वाहिन्यांचे राज्य पाहिले. आता ते नाहीसे होईल.” असे मत रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक व टाईम्स नाऊचे माजी मुख्य संपादक श्री. अर्णव गोस्वामी  यांनी व्यक्त केले.  अध्यक्षस्थानी पुद्दुचेरी विधानसभेचे सभापती व माजी मुख्यमंत्री श्री. व्ही. वैथिलिंगम हे होते.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेच्या पहिला सत्रात ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य : अतिरेकाची परिसीमा कोणती?’  या विषयावर ते बोलत होते.
यावेळी अरुणाचल प्रदेश येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. टामो मिबांग, मराठा आंदोलनाच्या नेत्या व वक्त्या अ‍ॅड. स्वाती नखाते, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशच्या कासौली सोलन येथील आमदार डॉ. राजीव सैझल यांना आदर्श युवा आमदार  पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. अर्णव गोस्वामी  म्हणाले, “ आजकाल पत्रकारांचा धाकच उरलेला नाही. कारण ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक रहात नाहीत. समाजामध्ये किती तरी अनिष्ट घटना घडत असतात. पण हे पत्रकार त्यावर ब्र देखील काढत नाहीत. निरर्थक अशा क्षुल्लक गोष्टींवर तासंतास प्रक्षेपण चालू असते. दुर्दैवाने जनतासुद्धा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेनाशी झाली आहे. कारण त्यांना प्रेरित करणारे माध्यमच नाही. ”
“ आजपर्यंत अनेक प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही उजेडात आणली. त्याचा पाठपुरावासुद्धा केला. यावेळी आमच्यावर अनेक प्रकारची दडपणे आली. आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याजवळ सत्ता आणि संपत्ती होती पण आमच्या जवळ सत्य होते. जनतेमध्ये त्यांच्याविषयी अनेक प्रकारचा असंतोष खदखदत होता. आम्ही केवळ त्याला वाट करुन दिली. आमच्यासारखे अनेक पत्रकार विविध ठिकाणी काम करीत होते. अखेर आम्ही सर्वजण मिळून एकत्र आलो. रिपब्लिक वाहिनी सुरू केली. ”
“ या पुढचे माध्यमांचे केंद्र हे दिल्ली मुळीच असणार नाही. कारण तेथील पत्रकारिता   सर्वात अधिक भ्रष्ट आहे. आता माध्यमांचे विकेंद्रीकरण होईल. कारण त्यातूनच खरी लोकशाही आकार घेणार आहे. विविध राज्यांच्या राजधान्या किंबहुना तेथील काही प्रमुख शहरे माध्यमांची  सशक्त केंद्रे बनतील. आमच्या डोळ्यापुढे सध्या मुंबई, पुणे आणि बेंगलोर ही शहरे आहेत. पण भविष्यात निरनिराळ्या ठिकाणी वाहिन्यांची केंद्रे उभी राहतील. ”
श्री. व्ही. वैथिलिंगम म्हणाले, “ अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे आपल्याला घटनेनेच दिलेले आहे. पण त्याचबरोबर आपण आपली नागरी कर्तव्ये विसरता कामा नयेत. अर्थात हे स्वातंत्र्य उपभोगताना देशाच्या अखंडतेला बाधा येता कामा नये. तसेच देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ”
प्रा. टामो मिबांग म्हणाले, “ भारतासारख्या विविधांगी देशाचे सरकार चालविणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. आपण जर सतत एकाच विभागाची बाजू घेत राहिलो, तर इतरांवर अन्याय होतो. ”
         अ‍ॅड. स्वाती नखाते म्हणाल्या, “ सध्या स्त्री कोठेही सुरक्षित नाही. कारण सर्वत्र पितृसत्ताक समाजव्यवस्था प्रस्थापित आहे. शिवाय समाजात नीतिमत्तेचा लवलेशही उरलेला नाही. अशावेळी महिला वर्गाच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. सध्या महाराष्ट्रभर मराठा आंदोलनाचा प्रसार झाला आहे आणि महिलांच्या रक्षणासाठी ही शक्ती सदैव उभी राहिल. ”
याप्रसंगी यावेळी रुतुजा शहा (महाराष्ट्र), राशिद अल्ताफ (जम्मू- काश्मिर), श्रेयस सेनाद (महाराष्ट्र), चंपकलाल जोशी (गुजरात), जेरोन दी सिटर (नेदरलॅन्ड) या विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
 श्रीमती नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...