पुणे(शिल्पा देशपांडे )-पुण्याच्या सांस्कृतिक भूमीत रोज नवे प्रयोग होत आहेत .नाट्यक्षेत्रात बरेच नवनवीन संकल्पना ,नवी दृष्टी ,नवे तंत्रज्ञान उदयाला येत आहे आणि हे सांकृतिक मार्गक्रमण काही ध्येय वेड्या कलंदरांच्या पाऊलखुणा उमटवत पुढे जात आहे ,असाच एक अविष्कार तब्बल १९ अंध पण प्रज्ञा चक्षु कलाकारांनी सादर केला, तेही कालिदास यांच्या मेघदूत या काव्यावरील नाट्यकृतीने !भारतीय साहित्य संस्कृतीतलं कालिदास हे सोनेरी पानं आणि त्यांच्या काव्याचे शिवधनुष्य पेललें या कलाकारांनी !दृष्टी नसताना रसिकांना काव्यातील अप्रतिम सौन्दर्यदृष्टी दिली ,
१९ अंध पण प्रज्ञा चक्षु कलाकारांचा अविष्कार..
अतिशय सुंदर नेपथ्य प्रकाशयोजना आणि संस्कृत मराठी काव्याचा सुंदर मिलाप म्हणजे अपूर्व मेघदूत !संस्कृत काव्याचे योग्य उच्चरण,मराठीची मधुरता यामुळे नाटिकेने एक वेगळाच आयाम प्राप्त झाला नृत्य न संगीताने अक्खे रंगमंदिर भारावून गेले आणि हे फक्त पुण्यातच घडू शकते कारण असे रंगकर्मी याच भूमीत येऊन गेले आणि येत आहेत .,यातच सांकृतिक परिक्रमेचा परीघ वाढत आहे ,दृष्टीच्या पलीकडील हि दृष्टी निश्चितच प्रकाशमय आहे