नवी दिल्ली- भारतीय लष्कराने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले. या एक तासाच्या सर्जिकल स्टाइकमध्ये 38 दहशतवादी ठार मारले पाकिस्तानी दहशतवादी बुधवारी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. भारतीय लष्कराने वेळीच दहशतवाद्यांच्या दिशेेने चाल करून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.आणि पुढील कारवाई केली . अशी माहिती
लेफ्ट. जनरल रणबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे . यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप होते.
उरी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी कारवाई करत अमेरिकेसारखे सर्जिकल हल्ले केले आहेत. उरी हल्ल्यात पाकिस्तानाचा हात असल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर केले आहेत. काल रात्री उशिरा ही कारवाई संपली आहे, असे सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत दोन सैनिक मारल्या गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताने दिलेले प्रत्युत्तर पाकिस्तानला झोंबले आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी भारताने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. तर पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भारताने आमच्या संयमाला दुबळेपणा समजू नये, असे त्यांनी सांगितले आहे.
भारतीय लष्कराने पहिल्यांदा पाकच्या सीमेत जाऊन दहशतवाद्यांच्या तळावर हल्लेे करून उरी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईची पाकिस्तानी लष्करालाही माहिती दिल्याचे सिंग यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने पाकमध्ये घुसून मारले ३८ दहशतवादी..(जनरल रणबीरसिंग यांची पत्रकार परिषद व्हिडीओ)
Date: