Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘के दिलं अभी भरा नहीं’या नाटकाची सेकंड इनिंग..

Date:

उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं ‘के दिलं अभी भरा नही…’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज झालंय. विक्रम गोखले आणि रिमा यांनी एकेकाळी गाजवलेले हे नाटक आता नव्या रंगाढंगात नाटयरसिकांना पाहता येणार आहे. ”गोष्ट तशी गमती”ची मधील गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत पुन्हा एकदा आपणास ‘के दिलं अभी भरा नही…’ मधून रसिकांचे  मनोरंजन करताना दिसणार आहे. यापूर्वी रिमा आणि विक्रम गोखले या जोडगोळीला एकत्र आणणाऱ्या या नाटकाला रसिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मात्र विक्रम गोखले यांच्या आजारपणामुळे हे नाटक मधेच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे हे नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिकांनाच  ‘दिलं अभी भरा नही’ असे म्हणावे लागले. अखेर, मायबाप प्रेक्षकांच्या इच्छापुर्तीसाठी वेद प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा गोपाळ अलगेरी यांनी हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

‘के दिलं अभी भरा नही’ या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटकात थोडे फार बदल केले असून सध्या या नाटकाची जोरदार तालीम चालू आहे. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी मंगेश कदम आणि लीना भागवत यांची भेट विक्रम गोखले यांच्याशी झाली. या भेटीदरम्यान त्यांनी शेखर ढवळीकर यांच्या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तोपर्यंत या नाटकात मंगेश कदम आणि लीना भागवत या  दोघांना नाटकातल्या व्यक्तिरेखेसाठी निश्चित करण्यात आले होते. विक्रम गोखले यांनी या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आपण त्यासाठी नाही म्हणणं योग्य ठरणार नाही असे मंगेश कदम यांना वाटले व त्यांनी या भूमिकेसाठी विक्रम गोखले यांना ऑफर दिली. मात्र विक्रम गोखले यांच्या बायकोच्या व्यक्तिरेखेत लीना या बसत नसल्याकारणाने या भूमिकेसाठी रिमा यांना विचारण्यात आले. यापूर्वीही अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले आहे. या नाटकाचे ७४ प्रयोग झाले. परंतु विक्रम गोखले यांना त्यांच्या डॉक्टरांनी घशाला जास्त ताण देऊ नका असा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे विक्रम गोखले यांचा नाटकातील प्रवास थांबवावा लागला. प्रेक्षकांनाही या नाटकाचे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तसेच विक्रम गोखले यांच्या आशीर्वादाने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे.  “विक्रम काका आणि रिमा यांच्या  आशीर्वादाने मंगेश आणि मी या भूमिकांमधून दिसणार आहोत. विक्रमकाका आणि रीमा अशा दोन मोठ्या नावांसह ते नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं आणि आता आम्ही करतोय, त्यामुळे अर्थातचं थोडं टेन्शन आलंय” असं लीना भागवत यांनी सांगितलं.

उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आली आहे. माणसे नोकरी लागली की आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करायला सुरुवात करतात. त्याप्रमाणे ते करायला सुरुवातही करतात मात्र हे सगळ करत असताना भावनिक व्यवस्थापनाचा विचार करायचा विसरून जातात. रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधी केलाच जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भाविनक गरजांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या सोबतच या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेलं हे नाटक १६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्मादाय रुग्णालयांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत मिळावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहराच्या आरोग्य क्षेत्रातील 'लाईफ लाईन' म्हणून ओळखल्या...

२०२२ नुसारच प्रभागरचना:एकनाथ शिंदे

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभागरचना होती,...

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शहरांच्या सर्वांगीण विकासावर...

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...