पुणे -बारावी च्या परीक्षेत यंदा राज्याचा एकूण निकाल 86.60% इतका लागला आहे. तर पुणे विभागाचा निकाल 87.26% इतका लागला आहे राज्यातील नऊ विभागांपैकी कोकण विभागाने 93% मिळवित प्रथम क्रमांक मिळविला आहे; तर नाशिक विभागाचा सर्वांत कमी लागल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर, या वर्षीही मुलींनीच (एकूण निकाल – 90.50%) बारावीच्या स्पर्धेमध्ये आघाडी राखली आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवार) राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल 4.5 टक्क्यांनी घटल्याचे निष्पन्न झाले असून विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला (93.16%) आहे. राज्याचा एकूण निकाल 86.60% इतका लागला आहे.
विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत 3 जून रोजी मिळणार आहे. याचबरोबर, यंदा 9 जुलैपासून बारावीची पुन:परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत 18 फेब्रुवारी ते 28 मार्च 2016 या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 42 हजार 882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 5 लाख 32 हजार 482 असून मुलांची संख्या 6 लाख 10 हजार 400 एवढी आहे.
विभागवार निकालांची यादी
कोकण विभाग – 93%
अमरावती विभाग – 85.81%
नाशिक विभाग – 83.99%
पुणे विभाग- 87.26%
औरंगाबाद विभाग- 87.80%
नागपूर विभाग- 86.35%
मुंबई विभाग- 86.08%
लातूर विभाग- 86.28%
कोल्हापूर विभाग- 88.10%
बारावी परीक्षेचा निकाल ८६.६० टक्के … पुणे विभागाचा निकाल ८७.२६ टक्के
Date: