Home Blog Page 1095

जनतेपासून दूर गेलेले PM मोदी महागाई वर बोलत नाहीत-

भ्रष्टाचाराच्या नावाखाली दोन मुख्यमंत्री तुरुंगात डांबले

आधी ते भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि मग त्यांच्या पक्षात जाताच ते स्वच्छ होतात

भीनमाल-काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राजस्थानमधील भीनमाल (जालोर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, मोदीजी आजकाल फालतू बडबड करत आहेत.कधी ते खोटे शौर्य दाखवतात, कधी गटारातून गॅस बनवतात, कधी ढगांमध्ये क्षेपणास्त्र सोडतात, कधी हवेत उडतात. त्यांना काय करावे समजत नाही. ते खरे तर देशातील जनतेपासून तुटलेले आहेत. महागाई आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर बोलत नाही.अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना काँग्रेसने जालोर-सिरोहीमधून उमेदवारी दिली आहे. वैभव यांच्या समर्थनार्थ होत असलेल्या सभेला सचिन पायलटांसह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहिले.

तुम्हाला काहीतरी देण्याचा केवळ प्रचार केला जात आहे, पण तुम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेस सरकारने करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढले, मात्र भाजप सरकारने कोट्यवधी लोकांना गरिबीत ढकलले आहे. पुन्हा भाजपचे सरकार आल्यास काहीही बदलणार नाही. कोणत्याही G-20 किंवा मोठ्या कार्यक्रमातून हा देश पुढे जाऊ शकत नाही.मोदीजी गरिबांचा संघर्ष ओळखायला तयार नाहीत हे आता स्पष्ट दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. सर्व यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आधी ते भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि मग त्यांच्या पक्षात जाताच ते स्वच्छ होतात. आज देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने देणग्यांची यादी मागितली तेव्हा सत्य समोर आले आहे. मोदीजींनी केवळ भ्रष्ट लोकांकडूनच देणग्या घेतल्या नाहीत, तर गुजरातमधील पूल कोसळणाऱ्या कंपनीकडून, लस बनवणाऱ्यांकडून आणि लॉटरी लावणाऱ्यांकडूनही देणग्या घेतल्या. यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काय असू शकतो?

देशभरात पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कायदा आणू. त्यात जॉब कॅलेंडर असेल. आमचे सरकार आल्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला वार्षिक एक लाख रुपये मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही बलवान व्हाल. देशभरातील महिलांना 50 टक्के सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. कामगारांना कायदेशीर हमी दिली जाईल. किमान वेतन किमान 400 रुपये असेल. मनरेगासारखी योजना शहरी भागासाठी आणली जाईल. अग्निवीर योजना त्वरित रद्द करण्यात येईल. जेणेकरून तुम्ही तुमचे काम सन्मानाने करू शकाल.

गेल्या 10 वर्षांपासून शेतकरी व महिलांवर अन्याय होत आहे. ना रोजगार उपलब्ध आहे ना शेतकऱ्यांना काही मिळत आहे. ज्याप्रमाणे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे, देशाची संपत्ती त्यांना दिली जात आहे, हे सर्व तुम्हाला परत मिळावे अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला फक्त खोटे बोलले जात आहे, सत्य तुम्हाला सांगितले जात नाही. आम्ही देशातील 30 लाख रिक्त पदे भरणार आहोत. पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक लाख रुपये मिळतील. आम्ही 5 हजार कोटी रुपयांचा निधी तयार करू जो फक्त तरुणांसाठी असेल.

अब्जाधीशांच्या मुलांची लग्नं मोठ्या थाटामाटात होत आहेत. या लोकांकडे इतका पैसा कुठून येतो? कारण मोदीजींनी त्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. या देशाचे एक सत्य हे आहे की गरीब रोज सकाळ संध्याकाळ झगडत आहेत. रोजगार देण्याऐवजी अग्निवीरसारख्या योजना आणत आहेत.

केवळ अब्जाधीशांनाच फायदा देणारे कायदे आणले गेले. शेतकरी ऐन थंडीत बसले, महिनोन्महिने सुनावणी झाली नाही. पंतप्रधानांचे घर काही अंतरावर होते, पण ते कोणाला भेटतही नव्हते. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या की मोदीजींनी काळे कायदे रद्द केले. त्यांची धोरणे फक्त बड्या अब्जाधीशांसाठी आहेत. त्यांचे धोरणही चांगले नाही.

मोदीजी देशातील जनतेपासून तुटले आहेत

मला असे वाटते की, सत्ता एवढी झाली की अधिकारी नेत्याला खरे सांगत नाहीत. मोदीजी जनतेपासून दूर झाले आहेत. कारण त्यांना कोणीही सत्य सांगत नाही. मोदीजी देशाला कोणत्या गोष्टी सांगत आहेत? तर साध्या समस्या म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. मात्र यावर चर्चा होत नाही. आज महागाई गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च आहे. मोदीजींच्या 10 वर्षांचे आभार. आज ते 400 रुपयांना सिलिंडर भरणार असल्याचे सांगत आहेत, पण गेली 10 वर्षे ते कुठे होते. आज निवडणुका आल्या आहेत म्हणून ते पेट्रोल आणि डिझेल सिलिंडरचे दर कमी करण्याबाबत बोलत आहेत.चिरंजीवी योजनेसह अनेक योजना विद्यमान सरकारने बंद केल्या. आजकाल अशा गोष्टी घडत आहेत ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होत आहे. पंतप्रधान आजकाल वायफळ बडबड करत आहेत. नुकतेच राजस्थानमध्ये आले असता त्यांनी काश्मीर हे बाबा रामदेव यांचे जन्मस्थान असल्याचे सांगितले. कधी ते फुशारकी दाखवतात, कधी खोटे शौर्य दाखवतात. कधीकधी ते मांस आणि मासे याबद्दल बोलतात. कधी कधी आपण ई-मेल बद्दल बोलतो तेव्हापासून ई-मेल नव्हते. कधी हवेत उडतात, कधी पाण्याखाली जातात. पण या गोष्टींचा तुमच्या जीवनात काय अर्थ आहे? सर्वात मोठी समस्या ज्यावर कोणी बोलत नाही, ती म्हणजे महागाई.

उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहाने शिवसेना अन् पवारांच्या मुलीच्या प्रेमामुळे NCP पक्ष फुटला

अर्धे झालेले पक्ष विकास करू शकणार नाही

भंडारा-अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे, शरद पवार म्हणतात की, आमचा पक्ष भाजपमुळे तुटला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचा पक्ष आम्ही फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या मुलीच्या प्रेमामुळे फुटला आहे. त्यांनी विनाकारण भाजपवर आरोप लावण्याची गरज नाही, असे म्हणत अमित शहा यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

शहा पुढे म्हणाले की, परिवारवादी पक्षांनी केवळ स्वत;चा फायदा पाहिला आहे. कुटुंबाचा फायदा पाहिला आहे. आता महाराष्ट्रात अर्धी झालेली शिवसेना व अर्धी झालेली शिवसेनेबरोबर कॉंग्रेस देखील अर्धी झालेली पार्टी बनलेली आहे. त्यामुळे अर्धी झालेल्या पार्टी या राज्याचा विकास करू शकत नाही. मोदींच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षच या राज्याचा विकास करू शकेल, असेही अमित शहा म्हणाले.

शरद पवार जेव्हा केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय दिलं. काहीही दिले नाही. त्यांनी दहा वर्षात महाराष्ट्रात दिले असेल त्याच्या कितीतरी पट मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला निधी दिला गेला. शरद पवार यांनी दहा वर्षात 1 लाख 91 हजार कोटींचा निधी दिला. तर मोदींच्या दहा वर्षांच्या काळात 7 लाख 15 हजार कोटींचा निधी दिला. रस्त्यांच्या विकासाठी 2 हजार कोटींचा निधी दिला. सर्वच क्षेत्रातील आवश्यक निधी दिला. त्यामुळे या देशाचा आणि राज्याचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वास जनतेला देखील आलेला आहे, असे म्हणत अमित शहा यांनी कॉंग्रेससह शरद पवारांवर हल्लाबोल केला.

कॉंग्रेसने बाबासाहेबांचा अवमान केला

आम्ही बहुमताचा उपयोग हा कलम 370 हटवण्यासाठी केला. ट्रिपल तलाक हटवण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही उपयोग करणार नाही, जो पर्यंत भाजप आहे तोपर्यंत आम्ही संविधानाचा सन्मान करत राहणार, अधिक मजबूत करत जाणार, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.आम्ही कधीही बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला नाही. पण या कॉंग्रेसवाल्यांनी बाबासाहेब यांना हरण्याचे काम केले. त्यांचा सातत्याने अवमान केला, असे म्हणत अमित शहांनी कॉंग्रेसवर आरोप केला. महायुतीचे भंडारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाऱ्यात सभा होत आहे. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’या विचार सरणीच्या मार्गाने चला

चर्याशिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांचे प्रतिपादन
पुणे : भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’या विचार सरणीच्या मार्गाने चला,ज्ञान हे सद‍्गुण आहे. ज्यांना ज्ञान आहे तो, कधीही आक्रमक असू शकत नाही. जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा, असे प्रतिपादन चर्याशिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांनी दिला. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले असतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील अपघात टाळण्यााठी गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय आपले जीवन पूर्ण होऊ शकत नाही. विशुद्वीने जीवनता विद्या प्राप्त करता येते, असेही यावेळी ते म्हणाले.
चर्चा शिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांच्यासह त्यांचे 31 शिष्य दिल्‍ली येथून कोल्हापूर येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी विहार झाले आहेत. रविवारी त्यांचे पुण्यात आगमन झाले. पुण्यातील माणिक बाग जैन मंदिरात त्यांचे स्वागत व प्रवचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 सकल दिगंबर जैन समाज व विविध संस्थांच्या वतीने ?त्यांचे राजाराम पुलावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.  सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष मिलिंद फडे, माणिक बाग जैन मंदिराच्या सुजाता शहा, ज्येष्ठ उद्योगपती प्रकाश धारीवाल, अचल जैन, उद्योगपती अरविंद जैन,उद्योगपती जमनालालजी हेपावत (मुंबई), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड, सुरेंद्र गांधी,  जितेंद्र शहा, विनोद जैन, अजित पाटील, महावीर शहा, महावीर शहा गोखळीकर, वीर कुमार शहा यांच्या सह जैन बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राजारामपूल ते सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदिरापर्यंत अभिवादन फेरी काढण्यात आली. मिरवणूकीत बँडपथक, ढोलताशांच्या निनादा सह जय जय गुरुदेवच्या घोषणांनाी परिसर दुमदमून गेला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन आचार्य श्री  विशुद्धसागरजी मुनिहाराज व त्यांच्या शिष्यांचे स्वागत करण्यात येत होते.  महिला डोक्यावर कलश व हाती ध्वज घेत मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या.
माणिक बाग येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदिरांच्या प्रवेशद्वारात जैनबांधवानी त्यांचे स्वागत केले. पुष्पवृष्टी करून जय जय गुरुदेव च्या घोषणा दिल्या. चर्या  शिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांचा विविध संस्थेसह पदाधिकार्‍यांनी श्रीफळ देऊन सन्मान केला.  पंचामृत अभिषेक, नारळ देउन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोब मुनीमहाराज यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जैन बाधंवाची मोठी गर्दी झाली होती.
आचार्य विशुद्ध सागर महाराज म्हणाले की, दिखाऊपणा नेहमी टाळावा. असे केल्याने आनंदाचे रूपांतर  सर्वानंदात होईल. निर्भय असणे ही जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक साधना आहे. संतांपासून दूर जाऊ नका आणि दिखाऊपणाच्या जवळ जाऊ नका. ते पुढे म्हणाले, जे इंद्रियांद्वारे जाणता येत नाही, ते जीव मनाद्वारे जाणतो. जेथे इंद्रिय मनाचा प्रवेश होत नाही, तेथे जीव ज्ञानाने जाणतो. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे, ते एका क्षणात नाहीसे होते.त्यामुळे सर्वांशी मैत्री करा, आपले जीवन घडवा, जन्म-मृत्यूच्या दुःखापासून दूर व्हा. तुमची इच्छा असेल तर क्षमता तुमच्या मनात आहे. आपल्या आहारात  शुद्ध शाकाहार अन्न, शुद्ध पाणी ठेवा. आपले विचार शुद्ध ठेवा असेही यावेळी श्री आचार्य यांनी सांगितले.  श्री भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’या विचार सरणीच्या मार्गाने चला.
पाणशेत येथील ओसाडे गावात जैन मंदिरांची प्रतिष्ठापना होणार आहे. चर्या शिरोमणी प. पू. 108 आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज व त्यांचे शिष्य यांच्या हस्ते मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. येत्या 20 एप्रिल रोजी ते कोल्हापूर येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी त्यांचे विहार होणार आहे.

१९ ते २५ एप्रिल कालावधीत पुण्यात बाल चित्रपट महोत्सव  

पुणे-   दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यातील बाल गोपालांचे मोठ आकर्षण असलेल्या बाल चित्रपट महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे हा मोहोत्सव संपन्न होईल. मोहोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी १० वाजता बाल गोपाळांना मोफत चित्रपट दाखवले जाणार असून श्यामची आई, वेल डन बॉईज, ताजमाल, म्होरक्या, जिप्सी, उबुंटू आणि छबीला हे गाजलेले बाल चित्रपट महोत्सवात दाखवले जातील. ‘संवाद पुणे आणि कावरे आईसक्रीम’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटासाठी येणाऱ्या बाल गोपाळांना कावरे आईसक्रीम तर्फे मोफत आईसक्रीम दिले जाणार आहे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रमुख प्रवीण बढेकर आणि सिटी प्राईड कोथरूड चे अरविंद चाफळकर यांच्या मौलिक सहकाऱ्यामुळेच हे सर्व चित्रपट बालगोपाळांना मोफत दाखवणे शक्य झाले आहे असे संवाद पुणे चे अध्यक्ष सुनील महाजन आणि कावरे आईसक्रीमचे राजूशेठ कावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  
  या चित्रपट मोहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी १०  वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची अप्रतिम भूमिका साकारणारा बालाकाराकार शर्व गाडगीळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आणि सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर यांच्या हस्ते संपन्न होईल. असे सांगून सुनील महाजन व राजूशेठ कावरे म्हणाले की,  शुक्रवार, दि. १९ – श्यामची आई, शनिवार, दि. २० – वेल डन बॉईज, रविवार, दि. २१ – ताजमाल, सोमवार, दि. २२ – म्होरक्या, मंगळवार, दि. २३ – जिप्सी, बुधवार, दि. २४ –  उबुंटू आणि गुरुवार, दि. २५ – छबीला असे या मोहोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.  
   ते पुढे म्हणाले की, मराठी माणसांच्या पिढ्यांपिढ्यां अंतःकरणात अढळ स्थान असलेल्या ‘श्यामची आई’चा सुजय डहाके दिग्दर्शित नवा आविष्कार असलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होत असून यंदाच्याच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणकारांची भरपूर प्रशंसा मिळविलेल्या अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबिला’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करून प्रख्यात अभिनेते बनलेले महेश कोठारे यांच्या हस्ते या बाल चित्रपट मोहोत्सवाची सांगता होईल.

   तीन वर्षांपूर्वी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बालपटाचा सन्मान संपादन करणाऱ्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ सोबतच गतवर्षी ‘राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या नियाझ मुजावर लिखित-दिग्दर्शित ‘ताजमाल’चा या महोत्सवात समावेश आहे. या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुण्याच्या कबीर खंदारे या बाल अभिनेत्यास ज्यूरींचे विशेष पारितोषिक मिळवून देणारा शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’ महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे.
   या शिवाय मोहन जोशी आणि विजय पाटकर यांच्या धमाल भूमिका असलेल्या प्रकाश जाधव दिग्दर्शित ‘वेल डन बॉइज’ आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ हे चित्रपट या महोत्सवात उत्तम मनोरंजनाची हमी देणारे आहेत.
   सुनील महाजन यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या रौप्यमहोत्सवी महोत्सवाच्या सूत्रधार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे या आहेत. केतकी महाजन-बोरकर हे संयोजक असून प्रोग्रॅम डायरेक्टर विशाल शिंदे हे आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस पक्षातर्फे आदरांजली

पुणे-महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आदरंजली वाहिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,    माजी आमदार , लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,सरचिटणीस अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेविका लता राजगुरू, अनुसूचित विभाग शहर अध्यक्ष सुजित यादव, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा,प्रशांत सुरवसे, अमर गायकवाड, चेतन अग्रवाल, गेहलोत आणि महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

‘शाहिरी भीमवंदनेतून’ डॉ. आंबेडकरांना मानवंदना 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुण्यातील आठ पुतळ्यांसमोर शाहिरी पोवाड्यांचे सादरीकरण
पुणे : जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार …अशा शब्दांत पोवाडयाच्या माध्यमातून पुणे रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शाहिरांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. पुणे आणि परिसरातील विविध आठ पुतळ्यांसमोर संविधान भीमरथ या फिरत्या रंगमंचाद्वारे ‘शाहिरी भीमवंदना’ हा पोवाडयाचा कार्यक्रम सादर करण्यात आला, त्याची सुरुवात या पुतळ्यापासून करण्यात आली.  
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यंदाचे हे नववे वर्ष आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शाहिरी भीमवंदना या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर देवराव कांबळे, महादेव जाधव, दत्ता भारती, जालिंदर शिंदे, पोपट हांगे, गोरख खामकर, वर्षा देशपांडे, राजकुमार गायकवाड, चंद्रकांत माने, ऋतुजा माने, अरुणकुमार बाभुळगावकर, आदी उपस्थित होते.  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि त्यांनी समाजाला दिलेली शिकवण पोवाड्याच्या माध्यमातून सादर करीत शाहिरांनी महामानवाला अभिवादन केले. जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार या शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेल्या पोवाडयातून डॉ.आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य शाहिरांनी उपस्थितांसमोर उलगडले. 
भारताचे थोर शिल्पकार, भीम भास्कर, आंबेडकर वीर, भीमाई जन्म देई, भीम पराक्रमी घडला इतिहास… यांसारखे पोवाडे देखील यावेळी सादर झाले. कॅम्प अरोरा टॉवर, अप्पर इंदिरानगर, पद्मावती, सिंबायोसिस सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, दापोडी- बोपोडी या आठ ठिकाणी पोवाडयाचा कार्यक्रम झाला. 

१ लाख नागरिकांना मोफत ताक,’दहा हजार किलोची मिसळ’

पुणे  :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी पुणेकरांनी एकत्र येत तब्बल १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजित उपक्रमात ‘दहा हजार किलोची मिसळ’ देखील नागरिकांना मोफत देण्यात आली. 
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ १० हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांना मोफत ताक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १५ बाय १५ फूट आणि  ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये मिसळ व त्यापेक्षा लहान कढईमध्ये ताक तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले. 
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. महेंद्र मारणे, विलास कसबे, संतोष पंडीत, बाळासाहेब रुणवाल, एकनाथ ढोले, संदेश काथवटे, सचिन विप्र, रवि गुडमेटी, राम तोरकडी, शेखर काळे, रुपेश चांदेकर, श्रीधर चव्हाण, प्रल्हाद गवळी, यशोदीप सोनवणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला. 
उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ८०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला १४० किलो, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग  इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यांसह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे. तसेच ताकासाठी १ हजार किलो दही वापरण्यात आले. 
महात्मा फुले यांची जयंतीदिनी गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातील विविध सामाजिक संस्थाना देखील या मिसळीचे वाटप करण्यात आले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समाज परिवर्तनाचे विचार

डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन

पुणे, दि. १४ एप्रिल २०२४: समाज परिवर्तनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता व हिंसेला कुठेही स्थान न देता हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. माणूस म्हणून जगण्यासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेतून प्रत्येक भारतीयाला दिला आहे असे प्रतिपादन केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संशोधनाचे सेवानिवृत्त संचालक व ज्येष्ठ वक्ते डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी रविवारी (दि. १४) केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणमधील उत्सव समितीच्या वतीने रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्तात्रय गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड, महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण, मुंबई), अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले व श्री. विठ्ठल भूजबळ यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्राचे अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून देश उभारणीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची माहिती दिली.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सिद्धार्थ धिवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतनआशय एवं विमर्श’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवलिंग बोरे यांनी केले तर श्री. बाबासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त उत्सव समितीने पुढाकार घेतला.

ब्राह्मण समाज एकत्र व संघटित होणे ही काळाची गरज-आमदार भीमराव तापकीर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नांदेड सिटी शाखेचे उद्गाटन

पुणे-ब्राह्मण समाज एकत्र व संघटित होणे ही काळाची गरज आहॆ व त्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ चे काम उल्लेखनीय आहॆ असे येथे भीमराव तापकीर यांनी म्हटले आहे.

आमदारांच्या हस्ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नांदेड सिटी शाखेचे आज उद्गाटन करण्यात आले, पुणे जिल्ह्यातील 19 वी शाखा आहॆ. याप्रसंगी या परिसरातील अनेक ब्रह्मवृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली व या परिसरातील दीड लाख ब्राह्मण लोकांना आगामी दोन वर्षात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाशी जोडण्यात येईल अशी ग्वाही दिली.

आई आधार केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात ब्राह्मण समाजासाठी मोठे योगदान असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
▪️स्नेहल गोरे – अंधवृद्धाश्रम▪️अनंत टोपे – शैक्षणिक क्षेत्र▪️नितीन फडणीस – सामाजिक क्षेत्र▪️आनंद गलगली – समाज प्रबोधन▪️सुनील भिडे – सामाजिक कार्य▪️प्रकाश गोरे – सामाजिक कार्य▪️वि ग सातपुते – थोर साहित्यिक

याशिवाय महासंघाच्या विविध महिला जिल्हा,शाखा पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.केतकी कुलकर्णी, सत्यजीत कुलकर्णी यांनी महासंघाच्या उपक्रमांची माहिती दिली.
शाखेतील महिला आघाडी तर्फे चैत्रगौर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.
लक्ष्मीकांत धडफळे,अमोघ पाठक, कमलेश जोशी, दत्तात्रय देशपांडे, शिल्पा महाजनी, हेमंत व जयश्री कासखेडीकर, धनश्री धडफळे,ऋचा पाठक, स्मिता इनामदार, अर्चना जोशी, शिल्पा वैद्य,अस्मिता इनामदार, श्रुती संगमनेरकर, आशा जोशी, मीना देशमुख, विनिता गोखले, गीता गलगली, ललिता कुलकर्णी , अवधूत देशमुख,उमाकांत कुलकर्णी, आशिष गोखले व अनेक समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन ललिता कुलकर्णी केले.

नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे – मुरलीधर मोहोळ

पुणे-विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता करण्यासाठी नवमतदारांनी महायुती ला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले.परशुराम सेवा संघाच्या वतीने आयोजित युवा ब्राह्मण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे,परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वजित देशपांडे, उपाध्यक्ष अपर्णा वैद्य, महायुती चे समन्वयक आणि भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले,शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.
तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि त्याचे तुम्हाला औत्सुक्य आहेच पण त्याच बरोबर भारताच्या विकासाचे भागीदार आणि साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.ह्या निवडणुकीत मोदीच विजयी होणार याची इतर देशांना देखील खात्री आहे कारण आत्ताच अनेक राष्ट्रप्रमुखांनी निवडणुकीनंतर त्यांच्या देशाला मोदींनी भेट द्यावी यासाठी आत्ताच निमंत्रण पाठविले आहे असेही ते म्हणाले. तसेच पुणे शहराच्या विकासात माझे योगदान असेल आणि तुमच्या स्वप्नातील पुणे उभारण्यासाठी मी सर्वतोपरी कार्य करेन असे ही मोहोळ म्हणाले.
आज येथे एकत्र आलेले शंभर पेक्षा जास्त ब्राह्मण युवा वर्ग जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचेल आणि पुण्यात भाजपा ला मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती करेल असे परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी स्पष्ट केले.
भारत तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करत असून यासाठी नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प नवमतदारांनी करावा, कारण देशाच्या विकासात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले. युवकांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्माणाचे कार्य सुरु असून पंतप्रधान मोदी यांनी स्टार्ट अप च्या माध्यमातून तुमच्या कल्पनाशक्तीतून जे अभिनव प्रॉडक्ट बनविण्यात येत आहेत त्याला देशांतर्गतच प्रचंड वाव आणि बाजारपेठ उपलब्ध केली आहे असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देताना “तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस वीस तास काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करून राष्ट्रनिर्मिती च्या कार्यात सहभाग नोंदविण्यासाठी पहिले मतदान मोदींना करा असे आवाहन देखील धीरज घाटे यांनी केले.
माधव भांडारी यांनी देखील युवा वर्गाशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रास्ताविक विश्वजित देशपांडे यांनी केले तर अपर्णा वैद्य यांनी आभार मानले.

हडपसरमध्ये डॉ. कोल्हेंनी विविध भागात केला धावता दौरा ..पण लोकांत उत्साह भारी

हडपसर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर गाठीभेटींचा सिलसिला कालपासून आज सकाळपर्यंत सुरूच होता . स्थानिक नागरिकांची यावेळी मोठी गर्दी दिसून आली .

काल सकाळी हडपसर येथे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सय्यदनगर, महंमदवाडी परिसरात गाठभेटींचा दौरा पार पाडला दरम्यान अनेक माजी नगरसेवक स्थानिक नेत्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला.दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पुर्वसंध्येला अनेक ठिकाणी भेट देऊन जयंतीच्या तयारीची पाहणी केली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात स्वागत करत आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे ठाम असल्याचा विश्वास दिला.यावेळी विठ्ठल भजनी मंडळ आणि महंमंदवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहला श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली. यावेळी महादेवजी बाबर साहेब, प्रशांतदादा जगताप, बंडूतात्या गायकवाड, भरतशेठ धर्मवच, संजयजी शेवाळे, हिंगणे ताई, अविनाश गोडबोले, यंसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो – खासदार डॉ. अमोल कोल्हे

हडपसर : शेवटच्या माणसामध्ये आत्मभान जागवणाऱ्या महामानवाची शिकवण आपल्या आचरणात असावी. त्याचबरोबर बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो, अस प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसर येथे केलं

महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त हडपसर येथे अभिवादन करताना डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी वानवडी येथील संविधान चौकात डॉ. कोल्हे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच सम्राट अशोक बोधी विहाराला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. कोल्हे म्हणाले की, शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाला आत्मभान देऊन त्याला जगण्याची ताकद आणि त्याच्या मनात स्वाभिमान पेरणाऱ्या महामानववाची शिकवण आपल्या आचरणात रोज असायला हवी.
आज देश अडचणीं चा सामना करत असताना जो राष्ट्रीय ग्रंथ त्यांनी आपल्याला दिला त्या भारताच्या संविधानाचे रक्षण करण्याची ताकद देशातील प्रत्येक नागरिकाला मिळायला हवी.

यावेळी महादेव बाबर, प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, प्रकाश म्हस्के, साहिल केदारी, विनय कदम, दिनेश गिरमे, अप्पा गिरमे, अमोघ गायकवाड, रविंद्र जांभुळकर, सतीश गवळी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

PM म्हणाले- 70 वर्षांवरील वृद्धांसाठी ₹ 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधणार

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला मोदींची गॅरंटी असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित आहेत.

भाजपचा जाहीरनामा

पंतप्रधानांनी विविध वर्ग आणि विभागातील लोकांना मंचावर बोलावून संकल्प पत्राची पहिली प्रत दिली. हे तेच लोक आहेत ज्यांना मोदी सरकारच्या आधीच्या काही योजनेचा लाभ मिळाला होता. यासोबतच गेल्या 10 वर्षातील आश्वासने आणि त्यांची पूर्तता यावर केलेला व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाच मोठी आश्वासने दिली…

  1. 2029 पर्यंत गरिबांसाठी मोफत रेशन योजना देण्याचे वचन.
  2. आयुष्मान योजनेंतर्गत 70 वर्षांवरील वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे वचन.
  3. मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 20 लाख रुपये असेल.
  4. गरिबांना 3 कोटी घरे दिली जातील.
  5. एक राष्ट्र, एक निवडणूक आणि समान मतदार यादी प्रणाली सुरू केली जाईल.

संकल्प पत्रासाठी 15 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या होत्या…

पंतप्रधान मोदींनी 25 जानेवारी 2024 रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. यानंतर पक्षाला 15 लाखांहून अधिक सूचना मिळाल्या होत्या. वृत्तानुसार, 4 लाख लोकांनी नमो ॲपद्वारे आणि 11 लाख लोकांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या सूचना पक्षाला दिल्या.

वृत्तसंस्था एएनआयच्या मते, भाजपच्या जाहीरनाम्याची थीम “मोदीची हमी: विकसित भारत 2047” सोबत सांस्कृतिक राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करेल. ज्या आश्वासनांची पूर्तता करता येईल, तीच आश्वासने पक्ष जाहीरनाम्यात समाविष्ट करेल. विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यावर या जाहीरनाम्यात भर असेल.

नवजात अर्भकांची तस्करी करणाऱ्या महिलांच्या टोळीला 16 एप्रिल पर्यंत कोठडी

पुणे:

नवजात अर्भकांची पैशांसाठी तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. या महिलांनी पाच अर्भकांची तस्करी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी महिला पुण्यातील असून, त्यात नामांकित रुग्णालयातील एका परिचारिकेचाही समावेश आहे.सईदा भीमराव कांबळे (वय ३५, रा. गोखलेनगर, शिवाजीनगर, पुणे), सुप्रिया शरद वाघमारे (वय ३९, रा. नवनाथ कॉलनी, केशवनगर, धनकवडी, पुणे), ललिता दत्तात्रेय गिरीगोसावी (वय ४५, रा. येरवडा), अफ्रिन दानेश शेख (वय २५, रा. पांढरेमळा, हडपसर), अमरीन रहीम सय्यद (वय ३२, रा लक्ष्मीनगर, येरवडा), आसमा जावेद शेख (वय ३०, रा. पांढरेमळा, हडपसर) अशी महिला आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाकड परिसरातील जगताप डेअरी परिसरात काही महिला अर्भकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दरम्यान, त्या ठिकाणी दोन रिक्षांतून सहा महिला आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे अर्भक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
ज्या दाम्पत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे, अशांची माहिती या टोळीतील परिचारिका अन्य आरोपी महिलांना देत होती. त्यानंतर त्या दाम्पत्यांशी संपर्क साधून त्यांना पाच ते सात लाख रुपयांत बाळ विकत देण्याबाबत सांगत. ज्या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा दाम्पत्याला पैशांचे आमिष दाखवून या टोळीतील महिला अर्भक घेऊन व्यंध्यत्व समस्या असलेल्या दाम्पत्याला विकत होते. ज्या दाम्पत्यांनी या टोळीतील महिलांकडून अर्भक घेतले आहे. अशा दाम्पत्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे गोळीबाराचा आवाज आला, असे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला.

मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.