पुणे – ‘मार्क्स’साठी मी कधी अभ्यास केलाच नाही. तो विषय समुजून घेण्याकडे माझा जास्त कल असतो. माहिती घेण्यापेक्षा त्याविषयाच अधिकाधिक ज्ञान मिळवण्याकडे माझा कल असायचा, असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. घरकुल लाँन्स येथे डी एस कुलकर्णी फाउंडेशन कडून डीएसके गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे तेथे ते बोलत होते. सोलापुरमध्ये सामान्य परिस्थितीत घालवलेलं बालपण ते आत्ताचे प्रसिद्ध लेखक हा त्यांचा जीवनप्रवास राजेश दामले यांनी मुलाखतीतून उलगडला.
मी ‘क्रिएटिव्ह’ नाही पण मी चांगला ‘इंटिग्रेटर’ आहे. लिखाणासाठी मला त्या विषयाची किक बसावी लागते. किंवा तुला हे येत नाही असा माझा कुणी अपमान केला कि मग मी झपाटून त्या विषयाच्या मागे लागतो व सोप्या भाषेत त्याचे लिखाण करतो. माणूस म्हणून आपल्याला एखाद्या विषयाचं कुतुहुल वाटायला हवं. आपण मुलांना चौकटिच्या बाहेर जाऊन विचार करू दिला पाहिजे आपल्या मर्जी त्यांच्यावर लादु नये. असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
न्युटन, आईनस्टाईन तसेच पंडीत भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जसराज यांच्या जीवनातील किस्से सांगून त्यांनी वातावरणात मोकळेपणा आणला. अनेक देश फिरत असताना हे जग किती मोठं आहे त्यातली माणसं किती मोठी आहे हे कळल्यावर तेव्हा मला समजलं की मला अजून किती पल्ला गाठायचा आहे. असेही ते म्हणाले.
संगणक युग हे त्यांच मराठीमधील पहिलं पुस्तक त्यानंतर बोर्डरूम, अर्थात, मनात, मुसाफिर, नादवेध या पुस्तकांनी जन्म घेतला. मुसाफिर या त्यांच्या आत्मचरीत्रामुळे बऱ्याच तरूणांना नैराश्य, आत्महत्येपासून दुर केलं.
आयआयटी पवई मधील दिवस, आदिवासींसाठी केलेला सत्याग्रह त्यामुळे जेल मध्ये घालवलेले दिवस, आयटी क्षेत्रातील वाटचाल, पुन्हा भारतात येऊन विविध विषयांवर केलेले लिखाण असा त्यांचा प्रवास त्यांनी प्रेक्षकांपुढे उलगडला. बंदिश गाऊन त्यांनी मुलाखतीची सांगता केली.
यावेळी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भूर्के, डी एस कुलकर्णी डेव्हलपर्सचे सीओओ धनंजय पाचपोर उपस्थित होते.