पुणे:- मेक इन महाराष्ट्र, डिजीटल महाराष्ट्र, कोशल्य विकास अशा योजनांमुळे उद्योगक्षेत्रात मोठी संधी
निर्माण झाली. या संधीचा तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा आणि आपला उद्योग, व्यवसाय वृध्दींगत करावा असे आवाहनमाहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी आज येथे केले.
जागतिक समस्त कासार समाज संस्थेच्यावतीने तरुण उद्योजकांसाठी पिंपरी चिंचवड येथे मेळावा आयोजितकरण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित विविध क्षेत्रातील तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्योजकांसाठी विविध योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. शासनाच्यावतीनेउद्योजकांसाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनांविषयी मार्गदर्शन करताना देवेंद्र भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञानामध्ये बदल होत असून शहरीकरण वाढत चालले आहे. भारताची अर्थव्यवस्था खुली आहे. बदलत्या परिस्थितीचा विचार करुन व्यवसाय व उद्योगाचे नियोजन केल्यास यश नक्कीच मिळेल. उद्योजकांपुढे नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. त्यावर मात
करण्यासाठी प्रादेशिकतेची भावना दूर करुन संघटित होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ज्या उद्योजकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहेत अशांना बँका तातडीने कर्ज पुरवठा करतात अशी माहिती त्यांनी दिली. उद्योगामुळे मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगांकडे वळावे असे आवाहन त्यांनीकेले.
शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे
महान्यूज वेब पोर्टल सुरु केले आहे. या वेब पोर्टलला भेट देऊन शासनाने जाहिर केलेल्या विविध योजना व धोरणांचीमाहिती नागरिकांना प्राप्त करता येते. त्याचबरोबर प्रसार माध्यमांद्वारे योजनांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. तरुणांनीयासाठी संपर्क वाढवण्याची आवश्यकता आहे अशी सूचना देवेंद्र भुजबळ यांनी केली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांना आधुनिक संकल्पना अनुभवायला मिळत आहेत. यामुळे उत्पादनआणि नागरिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. याबद्दल येथील संगणक तज्ञ सागर कासार यांनी दृक-श्राव्यचित्रफीतीद्वारे उपस्थितांसमोर सादरीकरण केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधींविषयी त्यांनीउपस्थितांना मार्गदर्शन केले. जगातील गुंतवणूक भारतामध्ये येत असल्यामुळे भारतातील उद्योजकांनी गुंतवणूकीसाठी पुढेआले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या मेळाव्यामध्ये उपस्थित तरुण उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यांना मिळालेल्या यशाबद्दल व अनुभवाबद्दल माहिती सांगितली.
मेळाव्याचे प्रास्ताविक अशोक दगडे यांनी केले तर सूत्र संचलन भालचंद्र कोळपकर यांनी केले. मेळाव्याला अशोकदगडे, अशोक तवटे, माधव अष्टेकर, तसेच महाराष्ट्राच्या विविध विभागातील उद्योजक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या उद्योग योजनांचा तरुणांनी लाभ घ्यावा … देवेंद्र भुजबळ
Date: