Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत -पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पुणे दि. 25- विद्यार्थी देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठीच शासनाच्या विविध योजना आहेत. विद्यार्थी दशेत चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

येथील अल्पबचत भवन येथे आयोजित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहस्तरावरील विविध उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगूरू विलास गायकर, बि. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे योग्य नियोजन करावे तरच त्यांना विविध क्षेत्रात यश मिळू शकेल. तसेच शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा योग्य वापर करावा. एखाद्या विषयात परिपूर्ण होण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करा. समाजातील विविध घटनांची माहिती व परिस्थितीची जाण ठेवणारा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो. आजच्या स्पर्धेच्या यूगात टिकण्यासाठी व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर मात करून पुढे जाणे हाच यशस्वी होण्यासाठीचा मार्ग असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जन्म हा आपल्या हातात नसला तरी देखील जन्मभर चांगला माणूस म्हणून जगणे आपल्या हातात आहे, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध प्रकल्पांमधुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास होणे महत्वाचे असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, स्टार्टअप ट्रायबल या योजनेचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाबरोबर वस्तिगृहातील शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठीचा सामंजस्य करार तसेच वसतिगृहातील विविध कामांचे मुल्यमापन करण्यासाठीचा गोखले महाविद्यालया सोबतचा सामंजस्य करार यावेळी त्यांच्या हस्ते सबंधितांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तसेच ज्ञानदर्पन या पुस्तकाचे, वस्तिगृह व आश्रमशाळेच्या कॅलेंडरचे प्रकाशन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांचा निवृत्ती सत्कार देखील करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

वसतीगृहातील विद्यार्थांची गुणवत्ता मुल्यमापनासाठी विशेष कक्ष

अदिवासी वसतीगृहात राहणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थांना शैक्षणिक सुविधा, तसेच कमी गुण असणाऱ्या किंवा उत्तम गुण असणाऱ्या विषयाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे मुल्यमापन करण्यात येणार असून त्यासाठी पुणे विद्यापीठा सोबत हा सामंजस्य करार केला असल्याचे देखील श्री. प्रसाद यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...