सहा वर्षापासून प्रलंबित असणार्या मागण्या पूर्ण नं झाल्यास तीव्र आंदोलन: डॉ दिपक वलोकर
पुणे-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असणार्या महाराष्ट्रातील ५० समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना मागील ३ ते ४ महिन्यापासून वेतनासाठी समाजकल्याण कार्यालयात फेर्या माराव्या लागत असून अगोदरच वर्षानुवर्षे प्रलंबित असणार्या मागण्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण संचालनालय तसेच विभागीय आणि जिल्हा स्तरावर प्रलंबित असणार्या या मागण्या पूर्ण नं झाल्यास येत्या २६ जानेवारीपासून महाराष्ट्र असोशिअशन ऑफ शोशल वर्क एज्युकेशन (मासवे) मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर यांनी कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रात एकूण ५० अनुदानित समाजकार्य महाविद्यालये असून बहुतांशी महाविद्यालयातील गोरगरीब कर्मचारी हे सतत या नं त्या कारणाने समाजकल्याण कार्यालय पुणे च्या अस्ताव्यस्त कारभारामुळे विविध कामांसाठी सतत पाठपुरावा करून देखील त्यांची कामे रखडवून ठेवली जात असतात यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ] सामाजिक न्यायमंत्री ] सामाजिक न्याय विभागाचे सचिव व समाजकल्याण आयुक्त यांच्या समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचार्यांच्या उपरोक्त प्रश्नांबाबत मास्वेच्या पदाधिकार्यांसोबत वारंवार बैठका झाल्या असून यासंदर्भात निवेदने देखील देण्यात अल्ली असून आजतागायत एक हि प्रश्न निकालात निघाला नसल्याची खंत डॉ वलोकर यांनी व्यक्त केली.
समाजकल्याण कार्यालयातून काही फाइल्स गहाळ असल्याचे सांगितले जाते, निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन लागू करून घेण्यासाठी समाजकल्यानच्या दारी येरजारया माराव्या लागत असतात तसेच विध्यार्थी शिक्षकांच्या प्रमाणानुसार शिक्षकांची उपलब्धता नसून देखील अशा ठिकाणी मंजूर पदे भरली जात नाहीत व नवीन पदे भरण्यास देखील मान्यता दिली जात नाही, बरेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षापासून पदोन्नती,] सी ए एस (CAS)प्रमोशन पासून वंचित असल्याने हा सरळ सरळ समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचार्यांच्या मुलभूत हक्क व मानवाधिकाराचे उल्लंघन करण्याचा प्रकार असल्याचे मत डॉ वालोकर यांनी व्यक्त केले.
दर महिन्याचे वीज, पाणी तसेच इतर वेगवेगळे खर्च, घराचे तसेच विम्याचे हप्ते व आजारपणाचा खर्च हा संपूर्णपणे पगारामधूनच करावा लागत असल्याने प्रत्येक कर्मचार्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा त्याच्या मासिक वेतनावरच अवलंबून असल्याने कर्मचार्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर करणाऱ्या समाजकल्याण कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात येत्या २६ जानेवारीनंतर आरपारची लढाई सुरु करणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. महेश ठाकूर, रजिस्ट्रार विनायक कस्तुरे, अधीक्षक सतीश खुडे, ग्रंथालय सहायक प्रकाश पवार, भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ विजय कुलकर्णी तसेच कर्वे समाज सेवा संस्था व भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय पुणे च्या शिक्षक व शिक्षेकतर कर्मचार्यांनी त्यांना समाजकल्याण कडून मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल निराशा व्यक्त केली..