….अखेर त्यांच्याही आत्म्याला मिळाली शांती ..  बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधीवत पूजन आणि विसर्जन

Date:

पुणे : हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते, तरचआत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याहीकारणाने रस्त्यांवर अनेक जण मृत्युमुखी पडतात काही मृतदेहांची ओळख पटवणे देखीलअवघड असते त्यामुळे हे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. मृत व्यक्तीची जात-धर्म न पाहता माणूसकीच्या भावनेतून अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्या निमित्त ८० बेवारस अस्थींचे विसर्जन नदीत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर या अस्थींचे विधिवत पूजन देखील करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, रोमा लांडे, अतुल सोनावणे, योगेश गोलांडे, सदाशिव कुंदेन, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई, बाला शुक्ला, राजू बलकवडे, संगीता ठकार अमर लांडे, विवेक टिळे ,किरण फाळके, सुरज लेकावळे उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष आहे. यावेळी सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते अस्थींचे पूजन करण्यात आले.

मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

समाविष्ट ३२ गावांच्या मिळकतकर नोंदींच्या सखोल ऑडिटचा प्रस्ताव

दरवर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त; GISसह...

७४ कोटींच्या कचरा प्रकल्पावर पुनर्विचाराचा प्रस्ताव; २० वर्षांच्या करारावर प्रश्न

निविदेनंतरच्या वाटाघाटी आणि कालावधीवाढीवर आक्षेप; ९ सप्टेंबरच्या स्थायी समिती...

स्मार्ट मीटरची छेडछाड अंगलट;भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणकडून गुन्हे दाखल

मीटरचे सील तोडून गती कमी करण्याचा प्रयत्न ९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी; उर्वरित १० प्रकरणांत कारवाई सुरू पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीज वापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे. चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला. स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे. गुन्हा दाखल झालेली प्रकरणे महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे : •             शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली = २,६६,८०० रुपये •             सचिन भास्करराव तायडे = १,१८,३६० रुपये •             सुरज संजीवकुमार सूर्यवंशी = १,५३,७७० रुपये •             दयानंद श्रीमंत रसाळ = १,४६,०७० रुपये •             संदीप लक्ष्मण गवळी  = १,५६,५९० रुपये •             विष्णू सखाराम चोपडे = १,४०,४१० रुपये •             भगवत नारायण इंगळे = १,४६,६५० रुपये •             आनंद जी. = ६८,८६३ रुपये •             ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = ४३,६२२ रुपये