पुणे,: अर्णब सेनगुप्ता आणि अनिरुद्ध अनिल कुमार या आर्म्ड फोर्स्ड मेडिकल कॉलेजमधील जोडीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत टाटा क्रुसिबल कॅम्प्स क्विझ २०१८च्या पुणे आवृत्तीचे विजेतेपद पटकावले.
पुण्यातील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेलीकॉम अॅण्ड मॅनेजमेंट अर्थात बीआयटीएममध्ये झालेल्या शहर पातळीवरील अंतिम फेरीमध्ये एकूण १५८ संघ सहभागी झाले होते. अर्णब आणि अनिरुद्ध यांनी विजेत्यांना दिले जाणारे ७५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त केले. हे दोघे राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आता विभागीय फेर्यांमध्ये सहभागी होतील. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया अॅण्ड कम्युनिकेशनचे स्टॅनी डेव्हिस आणि विजयदीप शुक्ला हे दोघे उपविजेते ठरले. त्यांना ३५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. श्री. बालाजी सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष तसेच बीआयटीएमचे डीन डॉ. (कर्नल) ए. बालासुब्रमणियन अंतिम फेरीत प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते.
टाटा समूहाचे १५०वे वर्ष साजरे करण्यासाठी यंदाच्या प्रश्नमंजूषेचा विषय टाटा समूहाच्या १५० वर्षातील व्यवसायांभोवती फिरणारा होता. या प्रश्नमंजूषेच्या परंपरेप्रमाणे, प्रख्यात क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमणियम यांनी त्यांचे नेहमीचे प्रभुत्व दाखवत, अत्यंत चतुर प्रश्नांना विनोदाची जोड देणार्या असाधारण शैलीत प्रश्नमंजूषेचे सूत्रसंचालन सांभाळले.
भारतातील सर्वांत मोठ्या कॅम्पस क्विझचे हे १४वे वर्ष असून ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ, ३८ शहरांमध्ये, पाच विभागीय फेर्या आणि त्यानंतर मुंबईत होणारी अंतिम फेरी अशा टप्प्यात होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना ५,००,०००* रोख व सोबतीला प्रतिष्ठेचा टाटा क्रुसिबल चषक असे मोठे बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेतील पारितोषिके फास्टट्रॅक आणि टाटा मोटर्स यांनी प्रायोजित केली आहेत.