पुणे-
मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या उपवासनिमित आणि संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील आलेल्या वारकरी बांधवासमवेत मुस्लिम बांधवांनी उपवास सोडला . मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट व श्री समर्थ स्टोलधारंक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील वारकरी आणि रमजानच्या उपवास करणारे मुस्लिम बांधवासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी करण्यात आले होते . सोमवार पेठेतील समर्थ व्यायाम मंदिरात हा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमास मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,पत्रकार सुनिल माळी , विघ्नहर्ता न्यायसचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई , बाबाजान दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष अड. ए. रेहमान , समर्थ व्यायाम मंदिराचे सचिव कांता येलवंडे , रफिक काझी , अड . नूरमोहम्मद तांबे , मेहबूब शेख , दीपक वनारसे , मरियम पटेल , फारुख बखला , आनंददास बाणे , मोहन डवरी , पांडुरंग चिकणे , शंकर खोपडे आदी मुस्लिम आणि वारकरी बांधव उपस्थित होते . यावेळी मुस्लिम बांधवानी दुआ म्हणली तर वारकरी बांधवांनी अभंगातून वारीचे महत्व पटवून दिले . आपण सर्व धर्म समभाव हा संदेश समाजाला देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले . अशा भावना व्यक्त करण्यात आल्या . यावेळी वारकरी बांधवानी शिरकुर्मा आणि फलाआहार देण्यात आला . तर मुस्लिम बांधवाना खजूर आणि फलाआहार देण्यात आला .