सातारा, दि.5 (जिमाका): किसान तात्काळ कर्ज योजनेमधून शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण केले जात असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे व बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रंबधक यांनी सयुंक्तरित्या केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असून शेतकऱ्यांना कृषी पुरक, कृषी उच्च तंत्रज्ञान इत्यादी कारणासाठी पतपुरवठा करण्यासाठी अग्रेसर आहे. किसान तात्काळ कर्ज योजना ही बँकेच्या नियमीत पीक कर्ज व किसान क्रेडीट कार्डधारकांसाठी असून योजनेव्दारे शेतक-यांना विनातारण-विनाकारण 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण केले जाते.