विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ :डॉ गिरीश बापट
‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे :
‘आर्थिक वाढ म्हणजे विकास ‘ हा या प्रचलित समीकरणाला अपवाद असणाऱ्या भूतान आणि क्युबा देशातील सम्यक विकासाचा वेध घेणाऱ्या ‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी इंद्र धनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व केंद्रात ज्ञान प्रबोधिनी चे संचालक गिरीश बापट ,राजहंस प्रकाशन चे संपादक आनंद हर्डीकर ,पर्यावरण अभ्यासक भरत मन्साटा,लेखक दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते झाले
‘सततच्या अमर्याद विकासाला ब्रेक लावला पाहिजे किवा दिशा वळवली पाहिजे याचे भान असलेले क्युबा आणि भूतान या देशाच्या विकसन तत्वज्ञानाचा अभ्यास मांडणारे हे पुस्तक महत्वपूर्ण असून दिशादर्शक आहे . जगाला विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ आली आहे ‘ असे प्रतिपादन यावेळी ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ गिरीश बापट यांनी केले
विकासाचे पर्यावरण आणि मानवता पूरक प्रारूप शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे ‘ असे आनंद हर्डीकर यांनी सांगितले
नागरिक आणि देशाच्या आनंदी असण्याचे प्रमाण हे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यापेक्षा महत्वाचे आहे हे भूतान ने जगाला दाखवून दिले तर क्युबाने भांडवलशाही नंतर शेतीचे सेन्द्रीयकरण ,शहरी शेती ,उत्तम संशोधने आणि महासत्तेच्या विरोधात जाउन मानवी विकासाची पर्यावरण पूरक वाट दाखवली ‘ असे मनोगत पर्यावरण अभ्यासक आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले
पौर्णिमा कुलकर्णी यांनी आभार मानले