मुंबई : प्रा. ल.बा. रायमाने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील
‘मिलिंद’चा चालता बोलता इतिहास असून मिलिंदने सामाजिक जाणिवा विकसीत करण्याचे फार मोठे काम केले.
‘मिलिंद’मध्ये झालेल्या अनेक उपक्रमांचे पडसाद राज्यभर उमटले. यात प्रा. ल.बा. रायमाने यांचा खूप मोलाचा
वाटा आहे. आजच्या पिढीसाठी यामुळेंच हा गौरवग्रंथ महत्वाचा आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्री. अर्जुन
डांगळें यांनी मुंबईत काढले.
प्रा. रायमाने यांच्या ‘आधारस्तंभ’ या गौरवग्रं्रथाच्या सुधारित दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन श्री. डांगळें
यांच्याहस्ते मुंबईत झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. लोक वाड.मय गृहाने प्रकाशित केलेल्या या गौरवग्रंथाचे
संपादन प्रा. अविनाश डोळंस आणि राम दोतोंडे यांनी केलेले आहे.
भुपेश गुप्ता भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळंस होते.
अध्यक्षपदावरूंन बोलताना अविनाश डोळंस म्हणाले की, मिलिंद ही समाज घडवण्याची, संस्कृती रूंजविण्याची
प्रयोगशाळां होती. मिलिंदमधील या ऐतिहासिक घडामोडीत प्रा. रायमानेंनी मोलाची भूमिका बजावलेली आहे.
बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रयत्नांचा हा गौरवग्रंथ दस्तावेज असल्याचे लहू कानडे यांनी नमूद केले.
प्रारंभी ल.बा. रायमाने यांनी मनोगत व्यक्त केले. हे सर्व केवळं बाबासाहेब आंबेडकरांचे श्रेय असल्याचे आवर्जून
त्यांनी सांगितले. राम दोतोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र भवरे यांनी