पंजाब -गुरुदासपूर चकमक अखेर संपली…मोठी हानी आणि मानहानी ही..

Date:

गुरुदासपूर चकमक अखेर सायंकाळी संपली यात ३ दहशतवादी ठार मारण्यात आले मात्र गुरुदासपूर हल्ल्यात पंजाब पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह यांना वीरमरण आले आहे.  एसपीसह आठ पोलिस, आणि अन्य काही नागरिक हल्ल्यात मरण पावले 
आज पहाटे सुमारे ३ दहशतवाद्यांनी येथील दिनानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केला  त्यानंतर तब्बल ११ तास पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. ती आता संपली आहे.

भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ हे पोलीस स्टेशन आहे. काही महिन्यापूर्वी याच पोलीस स्टेशनवर हल्ला झाला होता. हल्लेखोर लष्करी वेशात आले. त्यांनी आधी येथील बसस्थानकावर हल्ला केला. त्यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले. 

 पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या गुरदासपूरमध्ये आज (सोमवारी) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. पंजाबमध्‍ये 20 वर्षांनंतर अशा प्रकारचा दहशवादी हल्‍ला झालेला आहे.

लष्कराच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी आधी जम्मूच्या कटरा येथे जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्यानंतर गोळीबार करतच त्यांनी दीनानगर पोलिस ठाण्यात प्रवेश केला. तसेच एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही यश आले असून, दहा जण जखमी आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या मते हे दहशतवादी पाकिस्तानच्या नारोवलमधून आलेले असल्याची शक्यता आहे. सकाळी पाच वाजता हा हल्‍ला सुरू झाला. अजूनही थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरूच आहे. हल्‍लेखोरांमध्‍ये एका महिलेचाही समावेश असल्‍याचे समजते. दहशवाद्यांनी रेल्‍वे स्‍थानकावरही बॉम्‍ब ठेवले होते. पण, ते निकामी करण्‍यास यश आले.
bomb 3 gurdaspur-sniffer-dogs-afp-650_650x400_61437992172

घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी का केली नाही – बादल केंद्रावर बरसले
दरम्यान चकमक सुरु असताना ….
दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल सोमवारी म्हणाले. त्याचवेळी जर गुप्तचर संस्थांना अशा प्रकारच्या हल्ल्याची माहिती मिळाली होती, तर घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करायला हवी होती, अशा शब्दांत बादल यांनी नाराजीही व्यक्त केली.

हल्ला केलेले दहशतवादी हे पंजाबमधून आलेले नाही. ते सीमेवरून घुसखोरी करून आले आहेत त्यामुळे अशा प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करण्याची जबाबदारी ही, गृहखात्याची असते. मग माहिती असूनही अशी नाकेबंदी का केली नाही ? असा सवाल बादल यांनी केला. पंजाबमध्ये अनेक वर्षांनंतर अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. पण दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या आहे. ती राज्याची समस्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाप्रमाणेच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचेही बादल म्हणाले.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे तापाने फणफणले असल्याने आजारी आहेत. पण तरीही ते सुरक्षा संस्थांच्या संपर्कात असून या हल्ल्याबाबत माहिती घेत आहेत. आमचे अधिकारी अत्यंत शौर्याने हल्ल्याला उत्तर देत आहेत. माझी तब्येत ठीक नसली तर दर 10-15 मिनिटांनी संपर्कात राहत असल्याचे बादल म्हणाले आहेत. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आगामी काळात असे हल्ले टाळण्यासाठी, प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करत आहेत, ते दहशतवादी पाठवत आहे
समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास उत्सूक आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याकडून दहशतवादी पाठवले जात आहेत. पंजाबात झालेला हल्ला हे भारतीय गुप्तचर संस्थेचे अपयश आहे. हल्ल्याचा संसदेत सर्वपक्षीयांनी निषेध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा म्हणाले, काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवणे, ही घटना कशीही सहन केली जाऊ शकत नाही. सरकारने त्या लोकांविरोधात कोणती कारवाई होईल याचे आश्वासन देखील दिलेले नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....