अहमदनगर: पावसाळी अधिवेशनात तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ‘स्टिंग ऑपरेशन’ उघड करून
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचा खरा चेहेरा जनतेसमोर आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.काँग्रेस च्या आगामी आकर्षणाने आता काही मंत्री राधाकृश्नांच्या संपर्कात राहतील किंवा येतील काय ? यावर राजकीय खल सुरु झाला आहे, राधाकृष्ण यांनी किमान या आगामी आकर्षणाचा ट्रेलर तरी दाखवायला हवा होता असा तोम्नही मारला जातो आहे .
एका कार्यक्रमासाठी नगर येथे आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर कठोर टीका केली.केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आल्यापासून एकाही घोटाळा झाला नसल्याचे सत्ताधारी सतत सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात या सरकारांच्या काळात गैरव्यवहारांची मालिकाच सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. राज्यातील तिघा मंत्र्यांच्या गैरकारभाराचे आपण स्टिंग ऑपरेशन केले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याद्वारे सत्ताधा-यांच्या कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकज मुंडे यांच्यावर झालेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदी गैरव्यवहाराबाबत विखे पाटील म्हणाले की, मुंडे या सध्या परदेशात आहेत. त्यांनी आल्यानंतर याबाबत खुलासा करावा. विरोधीपक्षनेता म्हणून आपणही या प्रकरणाची माहिती मागविली असून त्याचा अभ्यास करून अधिवेशनात भूमिका मांडली जाईल. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिका-यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.