खो -खो सहित भारतीय खेळांना राजाश्रय ,समाजाश्रय हवा ! डॉ सतीश देसाई
मुंबई :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ :क्रीडा संस्कृती ,क्रीडा धोरण ‘ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्राचे खो खो चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि आता राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्व असलेले डॉ सतीश देसाई यांचे जोरदार भाषण मुंबईत झाले .
डॉ देसाई म्हणाले ,’ देशाचा संरक्षण मंत्री असतानाही यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या विजेत्या खो खो टीम बोलावून देशभर खो खो चा प्रसार करण्याचे प्रोत्साहन दिले आणि स्वत : मैदानात महाराष्ट्राच्या कर्णधाराला खो देवून रस दाखवला ! शरद पवार यांनी बारामतीसह अन्यत्र खो खो स्पर्धा आयोजन करून खो खो पुढे नेला ,
असे नेते आणि राजाश्रय असण्याची आज आवश्यकता आहे
ते म्हणाले ,’ ज्या खेळात वेग आहे ,आणि तरी कुठे थांबायचे याचे भान सांगतो ,अशा खो खो खेळाचे पुनरुज्जीवन करायचे तर फार मोठे नियोजन करण्याची गरज आहे
३-३ वर्षे अर्जुन ,शिव छत्रपति पुरस्कार दिले जात नाहीत ,
राजकीय नेत्यांकडे २०-२० सदनिका शासनाच्या १० टक्के सवलतीत असताना ,खेळाडूना मिळत नसतील तर परिस्थिती भीषण आहे
रक्त ,घाम ,अश्रू देवून खेळाडूंनी हा खेळ टिकवला . आता मोजके संघ वगळता इतरांची अवस्था बिकट आहे ,
पी एम आर डी ए सारख्या पुण्याच्या विस्तारित योजनेत जर खेळाला मैदाने नसतील ,राजकीय व्यवस्थेत जर खेळाची बाजू मांडणारे चाहते नसतील ,खेळाडूंना पेन्शन मिळाली नाही ,मैदानाबाद्द्दल प्रेम निर्माण झाले नाही ,खो खो मध्ये चौकात (खांबावर ) खेळण्याच्या आत्म्यावर नियमातून निर्बंध आले , तर भविष्यात परिस्थिती अवघड होईल
सर्व सामान्य घरातील खेळाडूंनी हा खेळ पेलून धरला आहे ,आता, चांगल्या घरातील खेळाडू खो खो मध्ये पुन्हा येतील ,माध्यमांसह समाजातील सर्व घटक त्यांच्या खेळाची ,नोकरीची ,राहण्याची काळजी वाहतील ,क्रीडा धोरण वेळेत येवून त्याची अमलबजावणी होईल ,तेव्हा राज्यातील खो खो ला उर्जितावस्था येईल ‘
या चर्चासत्रात भीष्मराज बाम,अंजली भागवत ,जया शेट्टी ,आदिल सुपारीवाला यांनी विचार मांडले
प्रतिष्ठान च्या वतीने सरचिटणीस शरद काळे ,हेमंत टकले यांनी विचार मांडले . शरद पवार यांच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित चर्चासत्र मालेत गुंफलेले हे सत्र आज सकाळी वानखडे स्टेडीयम गरवारे लाउंज मध्ये पार पडले .
पद्माकर शिवलकर ,उमेश झिरपे ,प्रवीण ठिपसे ,चित्रा वाघ ,निलेश राउत ,आनंद परांजपे उपस्थित होते
विजय साळवी यांनी सूत्र संचालन केले