पुणे- गेली १३ वर्षे संजय लीला भन्साळी यांनी ‘ बाजीराव मस्तानी ‘ या चित्रपटावर काम केले . अनेक अडचणी आणि असंख्यवेळा अडचणींचा मोठ्ठ्या हिकमतीने सामना करीत संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटाची निर्मिती केली . आता बाजीराव पेशवे हिंदुस्थान ची अस्मिता आहेत , ते थोर आहेत, महान योद्धे होते म्हणूनच त्यांच्यावर हा चित्रपट त्यांनी काढला … इतके वर्षे मेहनत घेतली , इतका पैसा खर्च केला … आता चित्रपट आल्यावर –किंवा प्रदर्शित होण्यापूर्वी पुण्यातील किंवा जे कोणी त्यांचे समर्थक आहेत आणि जे आता या चित्रपटाविरुध्द बोलत आहेत लिहित आहेत आंदोलने करीत आहेत , त्यांना जर खचितच बाजीराव पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते तर त्यांनी यापूर्वीच का नाही बाजीराव पेशवे यांच्यावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून चित्रपट काढला … ? असा सणसणीत सवाल आज संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात आज दुपारी संपर्क साधला असता त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला . पुण्याचे होते ना बाजीराव … बस एक पुतळा बसविला …या शिवाय त्यांची महती जगाला समजावी म्हणून त्यांच्या पराक्रमाची … प्रेमकथेची …कशी आणि कुठे दखल घेतली ? असाही सवाल यावेळी करण्यात आला . जो काम करतो त्याच्याच चुका दाखविल्या जातात … जो करीतच नाही त्याच्या चुका कशा आणि कुठून लक्षात येणार यासाठी हा सवाल करण्यात आला आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले .