नागरिकांनी एकत्र येउन राज्य शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करावे -नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे-आपला प्रभाग १३ हा हरित प्रभाग म्हणून ओळखला जावा यासाठी प्रभागात जेथे जेथे मोकळी जागा आहे तेथे तेथे वृक्षारोपण करु आणि नागरिकांच्या सहकार्याने त्याची निगा ही राखू असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.महाराष्ट्र शासनाने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे,त्यास अनुसरून पुणे शहरासाठी ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असुन त्यातील मोठा वाटा प्रभाग १३ चा असावा यासाठी ३१ जुलै पर्यंत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुयात असे ही त्या म्हणाल्या.
आज प्रभागातील स्वप्नशिल्प सोसायटी तसेच रघुकुल सोसायटी येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.यावेळी स्वप्नशिल्प सोसायटी येथील विवेक विप्रदास,माधुरीताई सप्रे,सुभाष झनपुरे,दिलीप देशपांडे,प्रशांत भोलागीर,सुधीर वैद्य,अजय माळवदे,अनघा देशपांडे,सौ विभाताई पडळकर,श्री हलकरे,श्री पंडित,श्री चौधरी इ उपस्थित होते.तर रघुकुल सोसायटी येथे सौ सुजाता नाडकर्णी,मोहनराव अळवणी,सौ मंजिरी बाब्रस,गुरुनाथ नाडकर्णी,सौ अंजली सोमण,श्री फडके,श्री अरगडे इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनी अत्यंत उत्साही वातावरणात वृक्षारोपण केले व ह्या झाडांची निगा राखण्याचा संकल्प ही केला.यावेळी स्थानिक वृक्ष लागवड करण्यात आली,यात प्रामूख्याने बेल, पिंपळ, वड ,फणस इ वृक्ष लावण्यात आले.
सर्व सोसायटीच्या तसेच बंगल्यांच्या आवारात व रस्त्यावरील मोकळया जागांवर वृक्षारोपण करण्यात येइल असे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.