पुणे-
‘भारतमाता की जय’,’वंदे मातरम्’; अशा घोषणा देत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुमारे ५०० हून अधिक युवकांनी काढलेल्या ‘तिरंगासन्मान मोटर सायकल रॅली’मुळे सारा कोथरूड ,बाणेर , बालेवाडी पाषाण परिसर दुमदुमून गेला. तारका फौंडेशनचे अध्यक्ष युवा नेतेआशिष कांटे यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीची सुरुवात कोथरूड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून झाली.सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा सलग सहा तास चाललेल्या या रॅली मध्ये आग्र भागी असणाऱ्या जीप मध्ये भारताचामोठा तिरंगा ध्वज फडकत होता.
वाहतुकीला अडथला न येऊन देता ३-३च्या रांगेत मोटर सायकलवरून चाललेल्या या युवकांनी हातात तिरंगी झेंडे आणि विविध घोष वाक्यांचेफलक घेतले होते.;आपला परिसर स्वच्छ ठेवा,;पर्यावरणाचे रक्षण करा,बेटी बचाव -बेटी पढाव,मुलगा होवो अथवा मुलगी पेढेच वाटा -अशाप्रकारचे विविध सामाजिक संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
अतिशय शिस्तबद्ध रीतीने कोथरूड ,कर्वेनगर ,पौडरस्ता, चांदणी चौक ,पाषाण ,सुतारवाडी ,सोमेश्वरवाडी ,बाणेर आणि बालेवाडी अशीमार्गक्रमणा करीत पाषाण येथील श्री शिव छत्रपतींच्या पुतळ्यापाशी या विराट रॅलीचं समारोप झाला. या प्रसंगी देशाने आणि समाजानेमाझ्यासाठी काय केले या ऐवजी मी देशासाठी आणि समाजासाठी काय केले हा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजेअसे सांगून या विराट रॅलीचेसंयोजक आशिष कांटे यांनी तरुणांनी संघटीत व्हावे .आणि त्यातून निर्माण झालेल्या उर्जेतून समाजातील प्रश्न आणि मतदार संघातील विकासाचे प्रश्नसोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगर सेविका सौ सुषमा प्रमोद निम्हण , अशोक दळवी, निलेश सुतार , मयूर सुतार , समीर उत्तरकर ,अमित खाणेकर,संदीप कुंबरे , किशोर मारणे, तुकाराम जाधव , अमर भगत ,कुमार खळदकर ,अजिंक्य सुतार ,कुमार पाषाणकर आदि मान्यवर उपस्थित होते .