पुणे-महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा संपन्न झाला . या स्नेहमेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ सुभाष साळुंके यांच्याहस्ते करण्यात आले . तर महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याहस्ते करण्यात आले .
या स्नेहमेळाव्यास महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव हेंद्रे , उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम , खजिनदार तानाजी सुर्वे , हवेली पुणेचे नायब तहसीलदार संजय भोसले ,राज्य महावितरणचे अभियंता शिवाजी वायफळकर , कामगार उपायुक्त अंकुशराव मोरे , माजी नगरसेविका सुरेखा निकम , गीतांजली सारगे, जयश्री हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ सुभाष साळुंके यांनी सांगितले कि , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आपण आज शासनामध्ये उच्च पदावर काम करू शकलो . शासकीय सेवेतून समाजकारण करता येते . समाजातून स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी निर्माण केले पाहिजेत . त्यासाठी तरुणांना मार्गदर्शन आपण करू असे आश्वासन दिले .
यावेळी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव हेंद्रे यांनी सांगितले कि , समाज विकासासाठी समाजातील अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मार्गदर्शन करावे . तसेच , समाजहिताच्या दृष्टीने वधू वर सूचक विनामूल्य सेवा सुरु केली . समाजासाठी समाजहिताच्या दृष्टीने जोशी समाज धर्म शाळा विनामूल्य देण्यात येईल . समाजातील अडीअडचणी समाजातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्ननाने सोडविल्या जातील . असे महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव हेंद्रे यांनी सांगितले .
यावेळी डॉ सुभाष साळुंके , संजय भोसले , बाळासाहेब श्रीपती हेंद्रे , गीतांजली सारगे , सुरेखा निकम , अश्विनी सावंत , जयश्री हेंद्रे , तानाजी सुर्वे , तानाजी पारगे , सुभाष साळुंके भानुदास मोरे , गणेश जोशी आदि मान्यवरांना शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . तसेच ,महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांच्याहस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले .
या स्नेहमेळाव्यामध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव हेंद्रे , सूत्रसंचालन रविंद्र जोशी तर आभार संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी मानले .