पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात नेहमीप्रमाणे यंदाही प्यायला पाणी नाही… दिवसाआड तीन तास पाणीपुरवठा शहरात होत असताना … पिण्याच्या पाण्याचा साठा कसा वाढवायचा ते सोडून भाजपचे खासदार आमदार आणि महापालिकेतील गटनेते ..गतिमान मेट्रो कशी येईल… आंतरराष्ट्रीय विमानतळ कसे होईल ? म्हणजेच करोडो अब्जावाधींची कामे कशी होतील / त्यांची टेंडर्स कशी निघतील याकडे च आकर्षित होवून कामे करताना -किंवा तेवढेच बोलताना तरी दिसत आहेत . पेट्रोल -डीझेल दरवाढ पाचवीला पुजली आहेच … कामगार क्षेत्रात असुरक्षित वातावरण आहेच आहे …सर्वांनाच पैशाच्या मागे धावावे लागत आहेच आहे … त्यात आता भर … पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. हवामान खात्याचे अंदाज … रोज २ दिवसात पाऊस पडेल असे येत आहेत . पण ना शेतीला पाणी ना पिण्यास मुबलक पाणी अशी अवस्था पुण्याची असताना भाजप मात्र मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरच बोलत आहे . खासदारांचे सोडा …विधानसभेत आठ म्हणजे १०० टक्के आमदार असताना हे हे आमदार २ वर्षात शहरासाठी काहीही करू शकलेले नाहीत. ना पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी त्यांनी काही केले ; ना शेतीच्या पाण्यासाठी साठा वाढविणारी योजना त्यांनी २ वर्षात आणली . पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असताना त्यांना मेट्रो- आणि विमानातच का सर्वप्रथम रस वाटतो आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.एवढेच नाही तर शहरात सर्वत्र उष्मा वाढविणाऱ्यां सिमेंटच्या रस्त्यांना आणि सिमेंटच्या जंगलांना हि भाजपची साथ असल्याचे स्पष्ट दिसते आहे . जल है तो कल है हे जाणून बुजून विसरल्याचे ढोंग केले जात आहेकाय? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे .