पीएमआरडीएकडून गाळ काढल्याने पाणीपातळीत पंचवीस टक्के वाढ:
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) कडून ‘गाळमुक्त
धरण व गाळयुक्त शिवार’ या धोरणावर आधारित हवेली तालुक्यातील वडकी येथील
ऐतिहासिक मस्तानी तलावातील गाळ काढल्याने तलावाच्या पाणी पातळीत २५% वाढ झाली
आहे. या पाण्यावर चार गावांची तहान भागून पाण्याचा वापर शेतीसाठी व जनावरांसाठी
करता येणार आहे.
इसवी सन १७२० साली ४ एकर क्षेत्रात असलेल्या या तलावातून २६,६०० घनमीटर(क्यूबिक
मी.) गाळ काढण्यात आला आहे. मस्तानी तलावाच्या पाझरातून जवळपास आजूबाजूच्या
परीसरातील ७० विहरींना यामुळे पाणी मिळू शकते. हा गाळ काढल्यानंतर तेथील शेतांना हा
गाळ टाकण्यात आला आहे. पालकमंत्री निधीतून ३ कोटी निधी या तलावासाठी मंजूर करण्यात
आला होता.
यंदा या भागात पाऊस कमी झाल्याने २५% पाणी साठा झाला आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात
झाल्यास आणखी पाणी पातळीत वाढ होईल. भविष्यात पाणी टंचाई जाणवणार नाही.
तलावाचे नुतनीकरण करून ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे.
असे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.