आमचा उकिरडा करू नका .. 11 गावांतील ‘त्यांची’ ओरड…

Date:

 

पुणे-आमचा उकिरडा करू नका .. “महापालिकेत येऊन फायदा काहीच झालेला नाही, पण उलटपक्षी गावचा कारभार थांबला. महापालिकेपेक्षा आमचे गाव बरे म्हणण्याची वेळ आली,’ अशा शब्दांत समाविष्ट 11 गावांमधील ‘त्या’ म्होरक्यांनी महापालिकेच्या सभागृहात ओरड केली . तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावात पायाभूत सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. परंतू ते आश्वासन आजवर पाळले गेले नाही. त्यामुळे या दोन गावांना दिलेली आश्वासने पुर्ण करा अन्यथा येत्या 20 एप्रिलपासून पुणे शहराचा कचरा येऊ देणार नाही, असा इशारा फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला पालिकेचे अधिकारी आणि समाविष्ट गावातील नेतेमंडळी व नागरिक उपस्थित होते

शहराची घाण आमच्या माथी का मारता, असा प्रश्‍न उपस्थित करत फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या हद्दीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांचा समावेश केल्याने कचरा डेपो विरोधातील लढा थांबेल, किंवा गावांचा समावेश केल्यांने आंदोलन होणार नाही, असे समजू नका असा इशारा फुरसुंगी गावातील नागरिकांनी दिला आहे. कचरा डेपो अन्यत्र हलवेपर्यंत कचर्‍याच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहराच्या विविध भागांत कचरा विघटन प्रकल्प कार्यान्वीत करून टप्या-टप्याने फुरसुंगीचा कचरा डेपो बंद करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील युवकांना महापालिकेत नोकरी देण्याचे आश्‍वासनही दिले होते. नोकरी दिलेल्यांना सहा महिन्यात कामावरून काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यांनी एकप्रकारे आमची फसवणुकच केली आहे. गावातील विकासकामे करण्यसाठी त्वरीत निवीदा प्रक्रीया राबवावी, अन्यथा 20 एप्रिलपासून शहराचा कचरा फुरसुंगी कचरा डेपोकडे येऊ दिला जाणार नाही, असा ईशारा यावेळी फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.

फुरसुंगीचे संजय हरपळे म्हणाले, “”गावकऱ्यांनी लाखो रुपयांचा कर भरला पण, एक एस्केव्हेटर (जीबी) किरकोळ कारणावरून बंद आहे. अशी कामे करता येत नसेल, आम्ही महापालिकेत का घेतले ? डेपोत टप्प्या-टप्प्याने कचरा बंद करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचे काय झाले ? “गावकऱ्यांच्या मागण्या केवळ कागदांवर ठेवल्या जातात. त्यांची पूर्तता करा, अन्यथा पंधरा दिवसांत गावकारी पुन्हा आंदोलनाची पवित्रा घेतील. कचरा डेपोबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास डेपोत कचरा येऊ देणार नाही,” अशा शब्दांत संजय हरपळे यांनी इशारा दिला .

उंड्रीचे सचिन घुले म्हणाले, “गावांचा विकास होईल, चांगल्या सेवा मिळतील, ही आशा खोटी ठरली. एकाही समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तेव्हा गावांत महापालिकेची राजवट का आणली ? नवे शैक्षणिक वर्षे सुरू होणार आहे. त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.’

शंकर हरपळे, श्रीरंग चव्हाण, दीपक बेलदरे, आशा बेनकर, संदीप तुपे, किशोर पोफळे, विकास कामठे, सुनील शिंदे यांनीही आपल्या भाषणात महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, “”गावांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार पायाभूत सुविधा प्राधान्य असेल. शैक्षणिक वर्षे सुरू होण्याआधी नियोजन करू.” 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.