ओतुर -(संजोक काळदंते)
जुन्नर तालुक्यातील ओतूर गावची कन्या राजगुरुनगरच्या गटविकास अधिकारी ईंदिरा अस्वार यांना प्रशासकीय कामात चांगल्या योगदानाबद्दल व ओतूर गावची शान वाढविल्याबद्दल ओतूर देवधर्म संस्था व समस्थ ग्रामस्थ ओतूर यांचे तर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘ओतूर भूषण पुरस्कार’सन्मानपुर्वक दिला जात आहे.
याबाबत त्यांचे सर्वच स्थरातुन अभिनंदन होत आहे.त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत असतानाच त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व प्रशासकिय कामकाजाबद्दल त्यांचा ठसा ओतुर आणि जुन्नर तालुक्याची मान उंचावनारा आहे म्हणुनच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री.कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व ओतुरचे विद्यमान सरपंच बाळासाहेब घुले यांनी सांगितले.
त्यांच्याबद्दल अधिक माहीती देताना त्यांचे वडील निवृत्त ग्रामविकास अधिकारी जयसिंग अस्वार यांनी सांगितले कि, ईंदिरा हिची सन २००९ साली वयाच्या २२ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (उच्च श्रेणी) पदी नियुक्ती झाली.नियुक्ती झाल्यानंतर पहिली पोस्टिंग मुंबई येथे ग्रामविकास विभागाच्या NRLM अभियानाच्या उपसंचालक पदी झाली .तेथील तिचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्या वेळचे ग्रामविकास विभागाचे सचिव श्री संधू साहेब (IAS) यांनी तिची बदली ता .निफाड जि. नाशिक या तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून केली. निफाड तालुक्याला लाभलेली पहिली महिला गटविकास अधिकारी म्हणून ३ वर्ष काम करण्याची संधी मिळाली .अतिशय जबरदस्त आत्मविश्वास, प्रशासकीय अनुभव ,निर्णयक्षमता,आणि आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रशासन चालविण्याचे कौशल्य अतिशय कमी वयात आत्मसात करून ईंदिराने आपले कर्तृत्व सिद्ध केले .
यानंतर मे २०१७ साली निफाड वरून पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर (खेड) या ठिकाणी बदली झाली.भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या तालुक्यात काम करण्याची संधी मिळताच १ वर्षाच्या आत तिने आपल्या इथून मागच्या प्रशासकीय अनूभवाचा व कामाचा पुरेपूर वापर करून २०१७ साली खेड तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त करून दाखविला .
प्रशासनावर असणारी जबरदस्त कमांड आणि कर्मचारी हाताळण्याची कला या मुळे ह्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला पेपर लेस तालुका म्हणून खेड तालुक्याचा महाराष्ट्रात पहिला नंबर आला.संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायती आता संगणकीकृत झाल्या आहेत.
ह्या व इतर अनेक गोष्टींची दखल घेऊन २०१८ सालचा ओतूर भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.