श्री क्षेत्र ओतुरचे ग्रामदैवत श्री.कपर्दिकेश्वर शिवलिंगावर होणाऱ्या कलात्मक तांदळाच्या पिंडींसाठी गावामधुन भावीक भक्त आपल्या यथेच्छ ईच्छा शक्तीनुसार मनोभावे तांदुळ वाहतात हा तांदुळ घरापासून मंदिरापर्यंत वाजत गाजत आणण्याची पुर्वपरंपरा आहे.
ओतुरला प्रती श्रावणी सोमवारी श्री कपर्दिकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर सुक्या तांदळाच्या कलात्मक पिंडी होतात या पिंडींचे दर्शन घेण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन भावीक भक्त येत असतात या पिंडी बनण्यासाठी लागणारा तांदुळ भावीक भक्त आपल्या ईच्छेनुसार मनोभावे देत असतात श्रावणी सोमवारच्या आधल्या दिवशी हा तांदुळ वाजत गाजत मंदिरापर्यंत आणला जातो आणि श्री कपर्दिकेश्वर चरणी विधीवत अर्पण केला जातो ही परंपरा पुर्व पुरातन काळापासून चालत आलेली असुन नवसाला पावनारा श्री कपर्दिकेश्वर म्हणुन या देवाची ख्याती आहे.घराघरातुन श्रद्धेने आणलेल्या तांदळापासुनच या ठिकाणी कलात्मक पिंडी होतात.असे कपर्दिकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी सांगितले.ओतुरला श्री क्षेत्र म्हणटले जाते या मागची ऐतिहासिक अख्यायिका आहे.जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु संतश्रेष्ठ श्री चैतन्य महाराज संजीवन समाधी मंदिर ओतुरच्या मांडवी नदीच्या तिरावरच श्री कपर्दिकेश्वर शिवमंदिराजवळ आहे.सदगुरु बाबाजी चैतन्य महाराजांनी संत तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला.आणि त्यांना दिलेला ” राम कृष्ण हरी ” हा गुरुमंत्र वैष्नवांचा गुरुमंत्र झाला गुरु शिष्याची परंपरा याच उत्तमापुर ओतुर या ठिकाणाहून सुरु झाल्याने या क्षेत्राला तिर्थस्वरुप प्राप्त आहे.
हे ओतुर श्री क्षेत्र ओतुर होण्यामागे अशाप्रकारे ऐतिहासिक पार्श्वभूमी व परंपरांचा ठेवाच आहे.संस्कृती आणि ऐतिहासिक सामाजिक परंपरा जपत ओतुरच्या श्री कपर्दिकेश्वर देवाची यात्रा म्हणजे श्रावण महीण्यातल्या प्रतिसोमवारी सोहळाच असतो.या पवित्र महिन्यात सत्वगुण जपत ही यात्रा ओतुरकरांसोबतच परिसरातील गावांमधील लोकांसाठी एक आनंदसोहळाच असतो.
श्री क्षेत्र ओतुरच्या कपर्दिकेश्वर चरणी भावीकांकडुन नवसाचा तांदुळ
ओतुर -(संजोक काळदंते)