जिल्ह्यात तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ओतुरमध्ये पहिल्यांदा मतदान प्रक्रिया -तान्हाजी तांबे तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष
ओतुर(संजोक काळदंते) -येथील १५ ऑगष्टची ग्रामसभा शुक्रवारी (दि.२४)खासदार शिवाजीदादा आढळरावपाटील सभागृह ग्रामपंचायत ओतुर येथे संपन्न झाली यावेळी इतर विषयासोबत महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समिती अध्यक्षपदाकरिता निवडणुक घेण्यात आली.विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात कुठेही या अध्यक्षपदाकरिता निवडणुक झाली नव्हती.
या ग्रामसभेमध्ये कचरा नियोजन व गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे विषय झाले यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड. या पदाकरिता गावातील प्रतिष्ठित नागरिक तान्हाजी तांबे,प्रकाश डुंबरे,विठ्ठल डुंबरे, मयूर ढोबळे,मिनाक्षी लाहोरकर, पंढरीनाथ पानसरे अशा सहा जणांनी अध्यक्षपदाकरीता ईच्छा व्यक्त केली परंतु कोणाच्याही नावावर एक मत न झाल्याने ओतुर गावचे सरपंच बाळासाहेब घुले तसेच ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी यांनी ग्रामसभेपुढे निवडणूक प्रक्रियेचा विषय ठेवला असता तो सर्वानुमते मान्य करण्यात आला व सहाही जणांमध्ये मतदान घ्यायचे ठरले यानुसार मतदान पत्रिका तयार करून उपस्थित ग्रामस्थांमधुन शांततेच्या मार्गाने मतदान घेण्यात आले.
एकूण १९९ जणांनी मतदान केले यात तान्हाजी विठ्ठल तांबे यांना ९८ मते, प्रकाश डुंबरे यांना ७६ मते, विठ्ठल डुंबरे यांना ५ मते, मयूर ढोबळे यांना ५ मते, पंढरीनाथ पानसरे यांना २ मते,मिनाक्षी लाहोरकर यांना ९ मते मिळाली तर ४ मते बाद झाली. तान्हाजी विठ्ठल तांबे यांची २२ मतांनी निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सतिश गवारी यांनी व सरपंच बाळासाहेब घुले यांनी जाहीर केले.तंटामुक्ती ग्राम समिती करिता निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात पहिल्यांदा संपन्न झाली असल्याने इतर गावांच्या दृष्टीने हा उत्सुकतेचा विषय बनला आहे जिल्ह्यात आजपर्यंत इतिहासात तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्ष निवड झाली होती मात्र निवडणूक प्रक्रिया पहिल्यांदा जुन्नर तालुक्यातील ओतुर याठिकाणी संपन्न झाली.येथे तंटामुक्ती अध्यक्ष पदाकरिता गेले अनेक दिवस काही अंशी वाद असल्याचे ऐकीवात होते हा वाद आता मिटला असेच म्हणावे लागेल तसेच तंटामुक्ती अध्यक्ष तान्हाजी तांबे हे सलग दोन वेळा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आता त्यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांनी हायट्रिक केली आहे. गावच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तान्हाजी तांबे म्हणाले की मी गावातील जास्तीत जास्त प्रमाणात असणारे महसूली तंटे तसेच फौजदारी तंटे गाव पातळीवर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून नवीन समिती नेमून समितीदेखील गावातील तंटे मिटवण्यासाठी कार्यरत राहील यापुढील काळात कमीत कमी तंटे होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.या ग्रामसभेला उपस्थित डॉ.सविता फलके व गणेश तांबे यांनी गावांमधील कचरा गोळा करण्यासाठी असणारी घंटागाडी वेळेत फिरावी तसेच गुरुवारी बाजारच्या दिवशी भाजीपाला व इतर कचरा गावात रस्त्यावर पडतो तो कचरा गोळा करून एका जागी बाजार करूंनीच टाकावा व ग्रामपंचायत कडून बाजारतळाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात यावी जेणेकरून या कचऱ्याचे नियोजन बाजार उरकल्यावर लगेच करता येईल व याचा त्रास ग्रामस्थांना होणार नाही याबाबत सरपंच बाळासाहेब घुले यांनी सांगितले की लवकरच गावातील कचरा नियोजन करणार असून गावात छोट्या गल्ली बोळांमध्ये फिरणाऱ्या घंटागाडीची व्यवस्था होणार आहे या ग्रामसभेला सरपंच बाळासाहेब घुले जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले पंचायत समिती सदस्य विशाल तांबे ग्रामपंचायत सदस्य अनिल तांबे, आशिष शहा,बाळासाहेब ढमाले,दत्तात्रय रोंगटे,डॉ.सुनिता वेताळ, वर्षा तांबे,सविता थोरात,स्मिता डुंबरे,मनीषा वारे, उपसरपंच राधाबाई जाधव, रईस मणियार, रामदास तांबे रत्नाकर धिरडे जालिंदर पानसरे उपस्थित होते तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून होतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी जगताप महसूल विभागाचे कामगार तलाठी राहुल पंदारे आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर गावची ग्रामसभा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन अशीही गाजणार व जिल्ह्यात चर्चा रंगणार हे सर्वसामान्य जनतेस नवीन नाही मात्र या निवडणुकीमुळे एक नवीन पायंडा पडला असल्याचे मत सुज्ञ ग्रामस्थांनी व्यक्त केले तर यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले म्हणाले की गावच्या विकासासाठी राजकिय मंडळींनी राजकारण विसरुन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे राजकारण विसरून आपण आपल्या गावचा विकास स्वतः साधू शकतो असे यावेळी बोलताना ते म्हणाले या सभेचे सुत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी यांनी केले तर सरपंच बाळासाहेब घुले यांनी आभार मानले.