पुणे- नियोजनाचा अभाव ,आणि घोळ कारभार , नियमांचा अवास्तव बडगा यामुळे ३० ते ४० टक्के लसींचे डोस माघारी जात असून शिल्लक राहत असलेल्या लसी ह्या३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्याची व्यवस्था करावी आणि लसीकरण केंद्रांची संख्या त्याचबरोबर वाढवावी अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सौ . धुमाळ यांनी याबाबत असे म्हटले आहे कि,’ सध्या पुणे शहरामध्ये १५ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत लसीकरण सुरु आहे. ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना लसीकरण सुरु झाले आहे. मनपाच्या वतीने ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. सदर केंद्राची संख्या ही प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया निहाय एकच केंद्र सुरु केलेले आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना लसीपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच आमच्या निर्दशनास आले की ४५ वयोगटावरील नागरिकांचा लसीचा पहिला डोस ब-यापैकी झालेला आहे.नियमानुसार ८४ दिवस झाल्याशिवाय दुसरा डोस घेता येत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक लसीकरण केंद्रावर ३० ते ४०% ह्या लस शिल्लक राहत आहेत. याची दोन कारणे आहे, एकतर ४५ वयोगटावरील लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली व ८४ दिवस न झाल्याने दुसरा डोस त्या व्यक्तिला घेता येत नाही. यामुळे लसी शिल्लक राहत आहेत. माझी आपणास विनंती आहे की शिल्लक राहिलेल्या लसी ह्या३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्याची व्यवस्था करावी जेणेकरुन ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना फायदा होईल.
पुणे शहरातील प्रत्येक नागरिकांना लस देणे बंधनकारक आहे. तसेच जे आपण ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देणे सुरु केले आहे. त्या लसीकरण केंद्राची संख्या वाढवुन प्रत्येक प्रभागनिहाय एक लसीकरण केंद्र ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु करावीत, जेणेकरुन या लसी शिल्लक राहणार नाही व ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना सुध्दा लस देता येईल.असेही दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.