26 मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार
“जिंदगीला रिव्हर्स नाही पण आपण तो टाकला ……” ‘ओली की सुकी ?’ ह्या चित्रपटाच्या टीजर मधील ह्या वाक्याने, तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारासाठी उत्कृष्ट चित्रपट आणि पदार्पण उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात नामांकने मिळाल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून निर्माते, वैभव उत्तमराव जोशी ह्यांच्या ‘नलिनोत्तम प्रोडक्शन’ निर्मित ‘ओली की सुकी’ हा एक जबरदस्त चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे . आनंद दिलीप गोखले ह्याची चटपटीत कथा आणि पटकथा असून अर्चना आपटे, अभयसिंह जाधव आणि तेजपाल वाघ ह्यांचे भाषेच्या विविध ढंगांचे संवाद आहेत. लेखक आनंद गोखले ह्यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. शिवाय उत्तम कलाकृतीचं श्रेय लेखन-दिग्दर्शना बरोबर चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना सुद्धा जातं. तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि जवळ जवळ १०-१२ इतर बालकलाकारांचा ताकदीचा अभिनय अत्यंत प्रेक्षणीय ठरला आहे .