म्हणाल्या ,’छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही
छत्रपती शिवाजी राजेंचा अवमान करून बक्कळ कमाई करण्याच्या प्रयत्नांना पायबंद न घालता अशा संधी साधू निर्माते दिग्दर्शकांना संरक्षण देत त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक करणे म्हणजे राज्यात लोकशाही चे किंवा भाजपाचे राज्य नसून ब्रिटीश राज असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरु केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक करणे म्हणजे राज्यात ब्रिटीश आले आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जात आहे. जितेंद्र आव्हाड हे लढवय्या नेते आहे. प्रश्न विचारण्यासाठी त्यांना ठाण्यात बोलाविले. नंतर असे कळले की, वरुन दबाब येत आहे तो कुणाचा हे माहित नाही. यात पोलिसांची काहीच चूक नाही. कारण त्यांना त्यांचे काम करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवत असेल आणि मनापासून कुणाला वेदना होत असेल तर त्यांनी आंदोलन करणे चुकीचे नाही. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.
अटक करणे चूक – रोहीत पवार
रोहीत पवार म्हणाले, माॅलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना अडचण येऊ नये म्हणून मदत करीत होते. सरकारनेच हर हर महादेव चित्रपट बंद करायला हवा होता. परंतू ते शांत आहेत. आव्हाड छत्रपतींच्या चुकीच्या इतिहासाविरोधत लढत असताना त्यांना अटक करीत असाल तर ते चुकीचे आहे. महाराजांबाबत चुकीचा इतिहास दाखवला तर आव्हाड गप्प बसणार नाही हे म्हटलेच होते. भाजप नेते नरेंद्र दाभोळकर यांच्या कर्मभूमीत जाऊन अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या गोष्टी बोलतात, शिंदे गटाचे लोक गोळीबार करतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची ईच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू शिवाजी महाराजांविरोधात लढले हे वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत ईतिहास दाखवला जात आहे.
ऐतिहासिक संदर्भ नाहीत
आव्हाड म्हणाले, सर्वांची जबाबदारी आम्हीच घेतली असे नाही जिथे – तिथे शो बंद पाडावे. आमच्या माध्यमातून संदेश राज्यात गेला. गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा कसा असेल, मला सांगा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. काही मुद्द्यांवर ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात नाही, जे घडलेच नाही कुणी वाचलेच नाही ते चित्रपटात दाखवले गेले.
यावर आव्हाडांचा आक्षेप
- जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
- रघूनाथाला हनुमान तसा शिवाजीला बाजीप्रभू असे लिहीले ते तसे नाही ती वाक्यरचना वेगळी आहे.
- मावळे दणकट असावे, देहसौंदर्य दाखवताना आपण ती भूमिका कुणाला साकारलायला देत आहोत. मेसेज काय जातोय. मावळे लुळे, पेंगळे का दाखवले गेले.
- अक्षय कुमारला विरोध नाही, पण महाराजांच्या लढाया सोळा ते छेचाळीस या वयात झाल्या, त्या वयात अक्षयकुमार बसत नाही.कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचे मुंडके उडवले हे स्पष्ट असतानाही विकृती दाखवली जात आहे.
- शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे मग विकृती दाखवली जात आहे.