मुंबई- यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 608 जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीने 173, काँग्रेसने 84, भाजपने 168 आणि शिंदेगटाने 42 जागा जिंकल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले , आणि राष्ट्रवादीच नंबर १ असल्याचा दावा केला . मात्र, या निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या याची आकडेवारी पवारांनी सांगितली नाही.
आम्हाला माहीत आहे आमच्या जागा किती आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली असे म्हणत इतर पक्षांना जर वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर, त्यांनी त्या आनंदात राहावं असा टोला पवारांनी भाजपचं नाव न घेता लगावला असून, पवारांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत मविआने 277 जागांवर विजय मिळवला असून, शिंदे गट-भाजपला 210 जागा मिळाल्याचंही पवार म्हणाले.