पुणे-शहरातील लहान-मोठ्या विकासकामांकरिता दर वेळी पोलिसांची परवानगी घेताना त्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार महापालिकेच्या बहुसंख्य सदस्यांनी केल्याने या कामांचे तपशील पोलिसांना केवळ ‘माहिस्तीस्तव सादर’ करावे, असे निर्देश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिले. या संदर्भात तातडीने पोलिस आयुक्तांशी चर्चा करून विकासकामांचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना केल्या.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/602523070527289/
पालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांना वाहतूक पोलिसांकडून जाणिवपूर्वक अडथळा आणला जात असून आर्थिक हेतूने पोलिसांकडून ठेकेदारांना दमबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. विकासकामांकरित आवश्यक असलेला ना हरकत दाखला द्यायलाही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लावला जात आहे. त्यामुळे विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांचे ना हरकत घेण्याची अट रद्द करुन केवळ माहितीस्तव कळवावे अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेमध्ये केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा विषय सभेपुढे उपस्थित केला. शहरातील रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत असा सवाल उपस्थित करीत त्यांनी पोलिसांकडून केल्या जात असलेल्या छळवणुकीबाबत माहिती दिली. वाहतूक पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दिल्यावर पोलीस संबंधित ठेकेदाराला बोलावून घेतात. त्यानंतर त्याच्याकडून निविदा किती रकमेची आहे याबाबत माहिती घेतात. ठेकेदाराचा जबाब लिहून घेतला जातो. ठेकेदार म्हणजे गुन्हेगार आहेत अशी वागणूक दिली जात आहे. तीन ते चार महिने परवानगी देत नसल्याने कामे होत नाहीत. वाहतूक पोलिसांना निविदेच्या रकमांची चौकशी करण्याची आवश्यकता का आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घेण्याची अट रद्द करुन त्यांना केवळ माहिती देणे आवश्यक करावे अशी मागणी केली.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/476512423291118/
शिवसेनेचे गटनेत पृथ्वीराज सुतार म्हणाले, शहरात यामुळे अडचण निर्माण झाली आहे. पालिकेच्या चार ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची परवानगी आवश्यक आहे का? अंतर्गत रस्ते-गल्ली येथे वाहतूक अडचण येणार नाही अशा ठिकाणी सुद्धा पोलीस अडचणी निर्माण करतात. ना हरकत न मिळाल्याने कामाला विलंब लागतो. अडचणी निर्माण होतात. ड्रेनेज, रस्ते अन्य कामाबाबत हीच तऱ्हा असून दोन वर्षांपासून पोलीस कलव्हर्टच्या कामाला परवानगी देत नाहीत. या गोष्टींची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1134690080210641/
मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी वाहतूक पोलीस ना हरकतीबाबत अडचणी निर्माण करतात. आमच्या प्रभागात ठेकेदाराव गुन्हा दाखल करण्यात आला. हा अंतर्गत रस्ता असून त्याचे आवश्यक काम सुरु आहे. केवळ नगरसेवकाच्या कुटुंबियांशी वाहतूक निरीक्षकांच्या झालेल्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडारोडा, कचरा उचलणाऱ्या वाहनांना जॅमर लावले जातात. कात्रजमध्ये अशाच ट्रॅक्टरला जॅमर लावल्याने तीन चार दिवस घाणीचे साम्राज्य झाले होते
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/488762172039757/