मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आपली देयके वाढून आली आहेत असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबीरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.
कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 ची घोषणा दि. 30 ऑक्टोबर 2017 ला ऊर्जामंत्र्यांनी केली होती. या योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यन्त असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.