ठाकरेंच्या खासदारांची 50-50 कोटींना खरेदी, संजय राऊत म्हणाले- ‘पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने देण्याची ओमराजेंना ऑफर!’

Date:

रात्री 11 वाजता फोन आला, 50 कोटींची डील उघड..कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली..ओमराजे निंबाळकरांवर खटल्याच्या निकालासाठी दबाव….

नवी दिल्ली/मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“अमित शहांच्या आमिषांना अनेक जण बळी पडतायत”
देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांच्या कथित पक्षांतराच्या घडामोडींवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांवर सातत्याने हल्ले करत भारतीय लोकशाहीचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या मते, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत झालेल्या परिसीमन विधेयकांवरील घडामोडींनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची भरपाई करण्यासाठी ते हे सर्व करत आहेत.
जयराम रमेश यांनी आरोप केला की, अवघ्या दोन वर्षांपूर्वी भाजपविरोधी भूमिका घेऊन निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आता भाजपच्या दिशेने वळत आहेत. यामागे मोठ्या प्रमाणात आमिषे आणि प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला.
“ज्यांना भाजपविरोधी भूमिकेमुळे जनतेने निवडून दिले, तेच आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना दिली जाणारी आमिषे धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे,” असे रमेश यांनी म्हटले.
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना जयराम रमेश यांनी त्यांच्या राजकीय रणनीतीची तुलना थेट म्युच्युअल फंड उद्योगाशी केली. ते म्हणाले, “हा अत्यंत संकुचित आणि कुटिल राजकीय अभियान आहे. या मोहिमेसाठी सर्व प्रकारची संसाधने वापरली जात आहेत. म्युच्युअल फंड उद्योग जसा प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजना आणि उत्पादने देतो, त्याचप्रमाणे राजकीय गरजांनुसार वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत.”
काँग्रेस नेत्यांनी भाजपवर लोकशाही संस्थांचा गैरवापर केल्याचाही आरोप केला. “या संपूर्ण प्रक्रियेत नैतिकतेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. या राजकारणाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही,” असे ते म्हणाले.
तथापि, या सर्व प्रयत्नांनंतरही विरोधकांना संपविण्याच्या अंतिम उद्देशात भाजप यशस्वी होणार नाही, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

या घडामोडींना अधिक वजन मिळाले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर या सर्व हालचालींना वेग आला असून, आज सकाळी शिंदे आणि संबंधित खासदारांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करायचा की थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा, यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली,” असे राऊत म्हणाले.

खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात सामील व्हा.

संजय राऊत म्हणाले की, खून प्रकरणचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही या लेटरवर सही करा आणि आमच्यासोबत या. जर देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था या पद्धतीने चालत असेल तर तर काय संविधान आणि काय न्यायव्यवस्था त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल दोन दिवस पुढे ढकलला गेला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी!

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

~ लाँच ऑफर: शून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~ पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे. आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील. एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल. या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे -ऐतिहासिक वारसा...