वि. दा. सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीका दिली होती

Date:

राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटला : पुणे न्यायालयातील उलटतपासात महत्त्वाच्या बाबी समोर

पुणे- राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटलयात आज पुणे न्यायालयातील उलटतपासात महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचे राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले , त्यांनी असेही सांगितले कि , आज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी उलटतपासात विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीका दिली होती असे मान्य केले .

पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यात आज फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा राहुल गांधी यांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी उलटतपास घेतला.याबाबत गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी माहिती देताना सांगितले की,

‘उलटतपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की त्यांच्या मातोश्री हिमानी सावरकर यांनी पुणे येथील कसबा व कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.तसेच, विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीकादिली होती, हे त्यांनी मान्य केले. सावरकर यांच्या दया याचीकेतील भाषा नम्रतेची होती, हेही त्यांनी स्वीकारले. दया याचीकेतील भाषा ब्रिटिश सरकारप्रती निष्ठा व्यक्त करणारी होती, हे त्यांनी मान्य केले नाही; मात्र ती भाषा तत्कालीन शासकीय व कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीनुसार होती, असे त्यांनी सांगितले.
दया याचीकेंच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली होती, हेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले. तसेच, माफीपत्रातील भाषा ही केवळ औपचारिक होती किंवा ती सावरकरांच्या राजकीय रणनितीचा भाग होती, हे सिद्ध करणारा कोणताही तज्ज्ञ अहवाल उपलब्ध नसल्याचेही त्यांनी मान्य केले. विनायक दामोदर सावरकर यांचा कैदी क्रमांक ३२७७८ होता, असेही त्यांनी सांगितले.
दिनांक १४ नोव्हेंबर १९१३ रोजी विनायक दामोदर सावरकर यांनी दोन पानांचे दया याचीका सादर केली होती आणि त्याचा संपूर्ण मजकूर सरकारी दप्तरी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक दया याचिके मध्ये “आय बेग टु रिमेन, सर, युवर मोस्ट ओबेंडीयंट सर्वंट, व्ही. डी. सावरकर असा मजकूर लिहून सावरकरांनी त्यावर सही केली
असल्याचे मला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच, माफीपत्र करणे हे क्रांतिकारकांवर बंधनकारक नव्हते; ते संबंधित कैद्याच्या इच्छेवर व निर्णयावर अवलंबून होते, असेही त्यांनी नमूद केले.
उलटतपासादरम्यान शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे शेवटपर्यंत त्यांच्या विचारसरणीवर व तत्त्वांवर ठाम राहिले होते, हे बरोबर असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्या कारणामुळेच त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, शिक्षा झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विनायक दामोदर सावरकर यांनी दया याचीका दाखल केल्याचेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी दिनांक १ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
या खटल्यात अ‍ॅड. ज्ञानेश्वरी जाधव, अ‍ॅड. सुयोग गायकवाड, अ‍ॅड. आकाश देशमुख, अ‍ॅड. सारंग बहिरट व अ‍ॅड. कैलास जिरे हे सहकार्य करीत आहेत.

उलटतपासातील ठळक मुद्दे

  • सावरकरांनी १० वेळा क्लेमन्सी पिटिशन्स दिल्याची कबुली.
  • दहा क्लेमन्सी पिटिशन्सची सरकारी नोंद उपलब्ध.
  • पिटिशन्स न्यायालयात दाखल केल्या नसल्याची कबुली.
  • सर्व क्लेमन्सी पिटिशन्स ब्रिटिशांनी नाकारल्याचा दावा.
  • दया याचिका करणे बंधनकारक नव्हते, असे उत्तर.
  • उलटतपास १ जुलैपर्यंत तहकूब.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न पुणे, दि....

२०४७ च्या विकसित भारताचा पाया मागील १२ वर्षांतच रचला गेला: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे -"स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने सन २०४७ मध्ये जो विकसित भारत...

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्ष उभारणार

पुणे- श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम...